शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

औरंगाबादला डॅशिंग आयुक्त द्या- सतीश चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 20:25 IST

औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा.

मुंबई : औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा. निवृत्ती जवळ आलेला किंवा शिक्षा म्हणून औरंगाबादला आयुक्त पाठवल्यामुळेच औरंगांबाद महापालिकेत अनागोंदी कारभार सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण यांनी केली.औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी सतीश चव्हाण म्हणाले की, कच-याचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा. तसेच मुख्यमंत्री कच-याचा प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी देणार आहेत, तो खर्च करण्याची व्यवस्था करावी. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेचे महापौर आणि नगरसेवक तीन वेळा परदेशात अभ्यास दौ-यासाठी जाऊन आले आहेत. यांचे परदेश दौरे झाले परंतु औरंगाबादचा कचरा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवक, महापौरांकडून परदेश अभ्यास दौ-याचा अहवाल मागून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.खदाणीत कचरा टाकण्याचा पर्याय समोर मांडला जात आहे. मात्र, खदाणीमध्ये कचरा टाकला तर सहा किलोमीटरच्या परिघातील पाणी दुषित होण्याची शक्यता आहे. जसे नरेगाव येथे कच-यामुळे गावकरी त्रस्त झाले. त्याप्रमाणेच खदाणीच्या आजुबाजुला राहणा-या लोकांनाही त्रास होईल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणVidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबाद