शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार घोलप यांची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:39 AM

देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांची एकहाती सत्ता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भाजप आणि शिवसनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र असे असली तरीही युतीच्या जागावाटपाचा पेच कायम आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटला असतानाही भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या युतीच्या जागेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांची चिंता मिटली आहे.

देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांची एकहाती सत्ता आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात घोलपांना शिक्षा झाली. त्यामुळे सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर त्यांच्यावर बंदी आली. त्यामुळे त्यांनी आपले पुत्र योगेश घोलप यांना रिंगणात उतरवले आणि विजयश्रीही खेचून आणला. कधीकाळी राष्ट्रवादीत असलेल्या रामदास सदाफुले यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत योगेश घोलप यांना आव्हान दिले. मात्र वडिलांप्रमाणे योगेश यांनी सुद्धा विजयाची मालिका कायम ठेवली.

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये असलेले सदाफुले पुन्हा इच्छुक आहेत . मागच्यावेळी युती नसल्याने सदाफुले यांना भाजपकडून लढता आले. यावेळी मात्र युती होणार असल्याचे जवळपास निश्चीत झाल्याने, सदाफुले यांना युतीच्या जागावाटपावेळी फेरबदल होण्याची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या युतीच्या जागेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सदाफुले यांची निराशा झाली आहेत तर विद्यमान आमदार असलेले योगेश घोलप यांची चिंता मिटली आहे.

मतदारसंघाचा आढावा

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या देवळाली मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दोन्ही समाजातील मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात. तर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवार यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याकडे इच्छुक उमेदवारांना कानाडोळा करता येणार नाही. युतीत शिवसनेचे घोलप यांची उमदेवारी निश्चित मानली जात आहे. तर सदाफुले हे ऐनवेळी काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहेत. त्यातच विद्यमान तहसीलदार राजश्री अहिरराव यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युतीचा अंतिम उमदेवारी निश्चीत होईपर्यंत या मतदारसंघात इच्छुकांची चर्चा सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे.