शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांची राळेगण वारी निष्फळ, २३ मार्चपासून उपोषणाच्या निर्धारावर अण्णा ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 22:36 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे.

अहमदनगर -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. अण्णा हजारेंना उपोषणासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर राजकीय गोटात वेगाने हालचाली सुरु झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष दूत म्हणून महाजन अण्णांकडे पोहचले, मात्र अण्णांनी चर्चेनंतर दिल्लीत उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे सांगून हवेतर दोन दिवस अधिवेशन दोन दिवसाने वाढवा आणि माझ्या मागण्या मान्य करा असं बजावले आहे.

येत्या २३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी जागा दिली दिली जात नसल्याबद्दलही अण्णांनी पंतप्रधानांना बारा वेळा पत्र लिहूनही परवानगी मिळत नाही, पोचही मिळत नसल्याने तुरुंगवास पत्करुन तेथूनच आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेरआज दिल्ली नगर निगम कडून अण्णांच्या संस्थेला परवानगीचं पत्र मिळाले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात खळबळ माजली. विरोधात असताना ज्या अण्णांच्या आंदोलनाचा लाभ तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसविरोधात अंसतोष भडकवण्यासाठी झाला त्या अण्णांच्या आंदोलनाला तोंड देण्यापेक्षा ते सुरु होण्यापासूनच रोखण्याची रणनीती भाजपाने ठरवल्याचं सांगितलं जातं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना राळेगण सिद्धीला पाठवले. अण्णांची समजूत काढण्यासाठी महाजन यांनी तासभर त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मात्र अण्णांची समजूत काढण्यात ते अयशस्वी ठरले.

      चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आहे. उद्या सकाळपर्यंत पर चर्चा करुन काही निर्णय निघू शकेल. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्धारावर ठाम असल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की अण्णांचे काही प्रश्न चुटकीसरशी सुटू शकत नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे. विधेयक आणावे लागतील. कायदे करावे लागतील. संसदेत शक्य आहे. आता बोलणे झाले आणि आता प्रश्न सुटला असे नाही. काही विषय त्याची व्याप्ती मोठी आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, देशाच्या हिताचे आहेत. मात्र ते तात्काळ सुटू शकत नाहीत.

विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. अण्णांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.अण्णांनी केलेल्या प्रमुख मागण्या - देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमिभाव मिळावा-देशात लोकपाल कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी - निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजनMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस