शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गिरीश महाजनांची राळेगण वारी निष्फळ, २३ मार्चपासून उपोषणाच्या निर्धारावर अण्णा ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 22:36 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे.

अहमदनगर -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. अण्णा हजारेंना उपोषणासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर राजकीय गोटात वेगाने हालचाली सुरु झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष दूत म्हणून महाजन अण्णांकडे पोहचले, मात्र अण्णांनी चर्चेनंतर दिल्लीत उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे सांगून हवेतर दोन दिवस अधिवेशन दोन दिवसाने वाढवा आणि माझ्या मागण्या मान्य करा असं बजावले आहे.

येत्या २३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी जागा दिली दिली जात नसल्याबद्दलही अण्णांनी पंतप्रधानांना बारा वेळा पत्र लिहूनही परवानगी मिळत नाही, पोचही मिळत नसल्याने तुरुंगवास पत्करुन तेथूनच आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेरआज दिल्ली नगर निगम कडून अण्णांच्या संस्थेला परवानगीचं पत्र मिळाले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात खळबळ माजली. विरोधात असताना ज्या अण्णांच्या आंदोलनाचा लाभ तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसविरोधात अंसतोष भडकवण्यासाठी झाला त्या अण्णांच्या आंदोलनाला तोंड देण्यापेक्षा ते सुरु होण्यापासूनच रोखण्याची रणनीती भाजपाने ठरवल्याचं सांगितलं जातं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना राळेगण सिद्धीला पाठवले. अण्णांची समजूत काढण्यासाठी महाजन यांनी तासभर त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मात्र अण्णांची समजूत काढण्यात ते अयशस्वी ठरले.

      चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आहे. उद्या सकाळपर्यंत पर चर्चा करुन काही निर्णय निघू शकेल. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्धारावर ठाम असल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की अण्णांचे काही प्रश्न चुटकीसरशी सुटू शकत नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे. विधेयक आणावे लागतील. कायदे करावे लागतील. संसदेत शक्य आहे. आता बोलणे झाले आणि आता प्रश्न सुटला असे नाही. काही विषय त्याची व्याप्ती मोठी आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, देशाच्या हिताचे आहेत. मात्र ते तात्काळ सुटू शकत नाहीत.

विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. अण्णांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.अण्णांनी केलेल्या प्रमुख मागण्या - देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमिभाव मिळावा-देशात लोकपाल कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी - निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजनMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस