शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

गिरीश महाजनांची राळेगण वारी निष्फळ, २३ मार्चपासून उपोषणाच्या निर्धारावर अण्णा ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 22:36 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे.

अहमदनगर -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मनधरणीसाठी राळेगण सिद्धीला पोहचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विरस झाला आहे. अण्णांशी बंद दाराआड तब्बल तासभर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. अण्णा हजारेंना उपोषणासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर राजकीय गोटात वेगाने हालचाली सुरु झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष दूत म्हणून महाजन अण्णांकडे पोहचले, मात्र अण्णांनी चर्चेनंतर दिल्लीत उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे सांगून हवेतर दोन दिवस अधिवेशन दोन दिवसाने वाढवा आणि माझ्या मागण्या मान्य करा असं बजावले आहे.

येत्या २३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी जागा दिली दिली जात नसल्याबद्दलही अण्णांनी पंतप्रधानांना बारा वेळा पत्र लिहूनही परवानगी मिळत नाही, पोचही मिळत नसल्याने तुरुंगवास पत्करुन तेथूनच आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेरआज दिल्ली नगर निगम कडून अण्णांच्या संस्थेला परवानगीचं पत्र मिळाले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात खळबळ माजली. विरोधात असताना ज्या अण्णांच्या आंदोलनाचा लाभ तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसविरोधात अंसतोष भडकवण्यासाठी झाला त्या अण्णांच्या आंदोलनाला तोंड देण्यापेक्षा ते सुरु होण्यापासूनच रोखण्याची रणनीती भाजपाने ठरवल्याचं सांगितलं जातं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना राळेगण सिद्धीला पाठवले. अण्णांची समजूत काढण्यासाठी महाजन यांनी तासभर त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मात्र अण्णांची समजूत काढण्यात ते अयशस्वी ठरले.

      चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आहे. उद्या सकाळपर्यंत पर चर्चा करुन काही निर्णय निघू शकेल. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्धारावर ठाम असल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की अण्णांचे काही प्रश्न चुटकीसरशी सुटू शकत नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे. विधेयक आणावे लागतील. कायदे करावे लागतील. संसदेत शक्य आहे. आता बोलणे झाले आणि आता प्रश्न सुटला असे नाही. काही विषय त्याची व्याप्ती मोठी आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, देशाच्या हिताचे आहेत. मात्र ते तात्काळ सुटू शकत नाहीत.

विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. अण्णांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.अण्णांनी केलेल्या प्रमुख मागण्या - देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमिभाव मिळावा-देशात लोकपाल कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी - निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजनMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस