शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'छोटा पुढारी': ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवर घनश्याम दरोडे म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:37 IST

अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे.

- मोसीन शेख 

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. यानंतर वेगवगेळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर "ठाकरे सरकराने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय असल्याची" प्रतिक्रिया 'छोटा पुढारी' म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी तो बोलत होता.

मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकराने केलेल्या कर्जमाफीबाबत घनश्याम दरोडे याने ठाकरे सरकारचे आभार मानले आहे. मात्र याच बरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी सुद्धा त्याने यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीबद्दल घेतलेला निर्णय दिलासादायक असून याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 10 रुपयात पोटभर जेवणाचा दिलेला शब्द सुद्धा पाळण्याच्या दिशेन त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा सुद्धा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सरकारने पुढेही असेच काम करावे असेही घनश्याम म्हणाला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी 25 हजाराची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असल्याच्या प्रश्नावर बोलताना घनश्याम म्हणाला की, उद्धव ठाकरे हे दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती आहे. त्यामुळे नक्कीच ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतली ही अपेक्षा आहे. मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचा जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाळायला हवे असेही घनश्याम म्हणाला.

फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी ठरली!

या आधीच्या फडणवीस सरकराने शेतकरी कर्जमाफीची फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरीही शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी झालीच नाही. तर भाजपच्या सरकराने केलेल्या कर्जमाफीमुळे ठरावीक शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळाला. फडणवीसांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाच वर्षात पाळला नसल्याचं सुद्धा यावेळी घनश्याम म्हणाला.