शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'छोटा पुढारी': ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवर घनश्याम दरोडे म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:37 IST

अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे.

- मोसीन शेख 

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. यानंतर वेगवगेळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर "ठाकरे सरकराने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय असल्याची" प्रतिक्रिया 'छोटा पुढारी' म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी तो बोलत होता.

मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकराने केलेल्या कर्जमाफीबाबत घनश्याम दरोडे याने ठाकरे सरकारचे आभार मानले आहे. मात्र याच बरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी सुद्धा त्याने यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीबद्दल घेतलेला निर्णय दिलासादायक असून याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 10 रुपयात पोटभर जेवणाचा दिलेला शब्द सुद्धा पाळण्याच्या दिशेन त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा सुद्धा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सरकारने पुढेही असेच काम करावे असेही घनश्याम म्हणाला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी 25 हजाराची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असल्याच्या प्रश्नावर बोलताना घनश्याम म्हणाला की, उद्धव ठाकरे हे दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती आहे. त्यामुळे नक्कीच ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतली ही अपेक्षा आहे. मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचा जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाळायला हवे असेही घनश्याम म्हणाला.

फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी ठरली!

या आधीच्या फडणवीस सरकराने शेतकरी कर्जमाफीची फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरीही शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी झालीच नाही. तर भाजपच्या सरकराने केलेल्या कर्जमाफीमुळे ठरावीक शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळाला. फडणवीसांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाच वर्षात पाळला नसल्याचं सुद्धा यावेळी घनश्याम म्हणाला.