शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

'छोटा पुढारी': ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवर घनश्याम दरोडे म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:37 IST

अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे.

- मोसीन शेख 

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. यानंतर वेगवगेळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर "ठाकरे सरकराने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय असल्याची" प्रतिक्रिया 'छोटा पुढारी' म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी तो बोलत होता.

मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकराने केलेल्या कर्जमाफीबाबत घनश्याम दरोडे याने ठाकरे सरकारचे आभार मानले आहे. मात्र याच बरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी सुद्धा त्याने यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीबद्दल घेतलेला निर्णय दिलासादायक असून याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 10 रुपयात पोटभर जेवणाचा दिलेला शब्द सुद्धा पाळण्याच्या दिशेन त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा सुद्धा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सरकारने पुढेही असेच काम करावे असेही घनश्याम म्हणाला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी 25 हजाराची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असल्याच्या प्रश्नावर बोलताना घनश्याम म्हणाला की, उद्धव ठाकरे हे दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती आहे. त्यामुळे नक्कीच ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतली ही अपेक्षा आहे. मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचा जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाळायला हवे असेही घनश्याम म्हणाला.

फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी ठरली!

या आधीच्या फडणवीस सरकराने शेतकरी कर्जमाफीची फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरीही शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी झालीच नाही. तर भाजपच्या सरकराने केलेल्या कर्जमाफीमुळे ठरावीक शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळाला. फडणवीसांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाच वर्षात पाळला नसल्याचं सुद्धा यावेळी घनश्याम म्हणाला.