शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 12:29 IST

मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामे आटोपून ठेवा मुंबईत धडकायचे आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितले. 

तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकतीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचे नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. मुंबई मधील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले आहे. 

छगन भुजबळ काहीही बरळतात. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा, भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार? मराठा, ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई यांच्या जरांगेंना दिल्लीला नेणार या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

आम्हाला ओबीसींमधून आरक्षण हवेय. आमची क्यूरीटीव्ह पीटिशनवर आमची शंका आहे. एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळविणार पाहा तुम्ही, असे आव्हान जरांगे यांनी दिले आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाही, आता कुठेच जात नाही. कायदा पारित करण्यासाठी आम्ही ४० दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली.  समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावले आहे तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये सरसकट घ्या. यादीतील ८३ क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण लागू होईल. मात्र राजकीय इच्छा शक्ती नाही. न्यायालयाने जर सांगितले असेल की जात मागास सिद्ध करा ते आयोगाला सिद्ध करावे लागेल. मात्र, जाचक आटी रद्द करायला पाहिजेत असे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा