शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 12:29 IST

मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामे आटोपून ठेवा मुंबईत धडकायचे आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितले. 

तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकतीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचे नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. मुंबई मधील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले आहे. 

छगन भुजबळ काहीही बरळतात. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा, भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार? मराठा, ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई यांच्या जरांगेंना दिल्लीला नेणार या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

आम्हाला ओबीसींमधून आरक्षण हवेय. आमची क्यूरीटीव्ह पीटिशनवर आमची शंका आहे. एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळविणार पाहा तुम्ही, असे आव्हान जरांगे यांनी दिले आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाही, आता कुठेच जात नाही. कायदा पारित करण्यासाठी आम्ही ४० दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली.  समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावले आहे तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये सरसकट घ्या. यादीतील ८३ क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण लागू होईल. मात्र राजकीय इच्छा शक्ती नाही. न्यायालयाने जर सांगितले असेल की जात मागास सिद्ध करा ते आयोगाला सिद्ध करावे लागेल. मात्र, जाचक आटी रद्द करायला पाहिजेत असे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा