शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
4
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
5
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
6
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
7
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
8
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
9
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
10
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
11
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
12
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
13
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
14
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
15
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
16
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
17
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
18
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
19
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
20
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 2:22 PM

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे.

मुंबई-गोवा रस्त्याची हालत १५ हजार कोटी रुपये खर्चूनसुद्धा खराब असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. परंतू, ही टोलमाफी वेळेवर मिळणार का, असा सवाल गणेशभक्तांकडून विचारला जात आहे. 

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी अशीच महिना-दोन महिने आधी गणेशभक्तांना टोलमाफीची घोषणा केली होती. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी राज्य शासनाने जीआर काढला होता. यामुळे अनेक वाहनचालकांना बिनापासच टोल भरत जावे लागले होते. यंदा त्याहून वेगळी परिस्थिती असण्याची शक्यता फारच कमी आहे. 

कारण गणेश चतुर्थी यंदा १९ सप्टेंबर, मंगळवारी येत आहे. यामुळे गणेशभक्त कोकणात १५ सप्टेंबर, शुक्रवारपासूनच जायला सुरुवात करणार आहेत. सोमवारी, १८ सप्टेंबरलाच हरतालिका आहे. यामुळे कोकणात जाणारे गणेशभक्त शुक्रवार दुपारपासूनच गावी जाण्यासाठी निघणार आहेत. यामुळे जर सरकारने पास वेळीच जारी केले नाहीत तर या सर्वांना टोल भरत जावे लागणार आहे. 

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. यामुळे राज्य सरकारने १३, १४ सप्टेंबरपासूनच आरटीओकडून पास देण्यास सुरुवात करावी अशी मागणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पुण्यातील गणेशभक्तांकडून होत आहे. 

मोफत एसटी बसही... 

महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. ट्रेन तीन महिने आधीच फुल झालेल्या आहेत. यामध्ये प्रचंड अनागोंदी झाल्याचा आरोप सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यामुळे गणेशभक्तांना एसटी बसचाच काय तो आधार असणार आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवtollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदे