शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

“गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 10:59 AM

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं.

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरखैरणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तर या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे माझ्याबद्दलची जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली. नाईक यांना माहित होते आपली औकात संपली असून, आपण मीरा-भायंदर, ठाणे, नवी मुंबई येथून मागे पडू आणि निवडून येणार नाही. त्यामुळे निवडून येण्याची खात्री नसल्याने फक्त मला बदनाम करण्यासाठी नाईक यांनी पवारांना माझ नाव सांगितेले असल्याचं आव्हाड म्हणाले.

तर आम्ही मेहनत करून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवून टाकला. जेव्हा कल्याण- डोंबिवलीमध्ये आमचा महापौर होता, त्यावेळी नाईक कुठेच नव्हते. मात्र नाईक राष्ट्रवादीत आले आणि कल्याण- डोंबिवलीमधुन त्यांनी राष्ट्रवादी संपवून टाकली. डोंबिवलीमधुन मी 9 नगरसेवक निवडून आणले होते, मात्र त्यांनी ते 1 वर आणले असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं. तर गणेश नाईक यांच्यामुळे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.