शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:00 IST

गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही.

 भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी अत्यंत प्रसिद्द आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्याच एका निवडणूक प्रचाराचा किस्सा सांगितना, आपण मटण वाटूनही निवडणूक कशी हरलो हे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, मतदार अत्यंत हुशार असतात. ते सर्वांनी दिलेला माल ठेऊन घेतात आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच देतात, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयोग करून चुकलो आहे. एकदा निवडणुकीत तर एक-एक किलो सावजीचे मटण घरी पोहोचवण्याचेही काम झाले. पण आम्ही निवडणूक हरलो.

लोक हुशार आहेत - गडकरी म्हणाले, लोक अत्यंत होशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवूनघ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे, जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची आवश्यकता लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नलते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही.

नितिन गडकरी म्हणाले, लोक म्हणतात सर MP चे तिकीट द्या. नाही तर MLA चे तरी तिकीट द्या. नाही तर MLC तरी बनवा. हे नसेल तर आयोग तरी द्या. यांपैकी काहीच नाही, तर मेडिकल कॉलेज द्या. मेडिकल कॉलेज नाही तर, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फिर Bed कॉलेज तरी द्या. हीही शक्य नसेल, तर प्रायमरी स्कूल तरी द्या. यातून शिक्षकांचा अर्धा पगार आम्हाला मिळेल. मात्र याने देश बदलत नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाElectionनिवडणूकnagpurनागपूर