शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

बढत्यांच्या आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठावर अवलंबून, नवी कलाटणी : जानेवारीपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 3:10 AM

अजित गोगटे मुंबई : अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त आणि विशेष मागासवर्गांसाठी सरकारी सेवांमध्ये राखीव जागा ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाने पाचहून अधिक न्यायाधीशांचे घटनापीठ काय निकाल देते यावर अवलंबून असणार आहे. हे घटनापीठ कदाचित पुढील महिन्यात स्थापन होऊन त्यानंतर सुनावणी व निकाल होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ...

अजित गोगटे मुंबई : अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त आणि विशेष मागासवर्गांसाठी सरकारी सेवांमध्ये राखीव जागा ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाने पाचहून अधिक न्यायाधीशांचे घटनापीठ काय निकाल देते यावर अवलंबून असणार आहे. हे घटनापीठ कदाचित पुढील महिन्यात स्थापन होऊन त्यानंतर सुनावणी व निकाल होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बढत्यांमधील आरक्षणाची स्थिती निदान जानेवारीपर्यंत तरी ‘जैसे थे’ कायम राहील, असे दिसते.बढत्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारचा सन २००४ मधील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट रोजी घटनाबाह्य ठरवून रद्द केला. त्याविरुद्ध राज्य सरकारखेरीज आॅर्गनायजेशन फॉर राइट््स आॅफ ट्रायबल्स, विमुक्त जातीज, नोमॅडिक ट्राईब्ज अ‍ॅण्ड स्पेशल बॅकवर्ड क्लास एम्प्लॉईज अ‍ॅण्ड आॅफिसर्स असोसिएशन व महाराष्ट्र स्टेट कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ इत्यादींनी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केली आहेत.सुनावणी घेणाºया मूळ खंडपीठातून न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी माघार घेतल्यानंतर सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांचे विशेष खंडपीठ स्थापन केले गेले. ही अपिले या खंडपीठापुढे बुधवारी दुपारी आली तेव्हा राज्य सरकारतर्फे उभे राहिलेले अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी अन्य एका खंडपीठाने मंगळवारी दुसºया एका प्रकरणात दिलेल्या आदेशाकडे लक्ष वेधले.त्या प्रकरणात उपस्थित झालेल्या मुद्द्यांचे या अपिलांशी साधर्म्य असल्याने त्याचा निकाल होईपर्यंत या अपिलांवरील सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब ठेवण्याचे खंडपीठाने ठरविले.उच्च न्यायालयाने बढत्यांमधील आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने एम. नागराज वि. भारत सरकार या प्रकरणात सन २००६ मध्ये दिलेल्या निकालाचा प्रामुख्याने आधार घेतला होता. राज्यघटनेच्या अनुच्छेद १६ (ए) नुसार आरक्षण द्यायचे असेल तर संबंधित समाजवर्गाच्या मागासलेपणाचे व त्या समाजास सरकारी नोकºयांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही याचे ठोस पुरावे असतील, तरच ते देता येईल, असा हा निकाल आहे.मंगळवारी त्रिपुरा सरकार वि. जयंता चक्रवर्ती या प्रकरणात नागराज निकालाच्या योग्यपणाचा मुद्दा उपस्थित झाला व न्या कुरियनजोसेफ व न्या. आर. भानुमतीयांच्या खंडपीठाने हा विषय घटनापीठाकडे सोपवावा, असे आदेश दिले. अ‍ॅटर्नी जनरलनी हाच आदेश बुधवारी महाष्ट्रातील याआपिलांच्या संदर्भात निदर्शनास आणला.दिग्गज वकिलांची फौज-या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून दिग्गज वकिलांची फौज उभी राहिली आहे. आरक्षण टिकून राहावे यासाठी अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांच्याखेरीज अरविंद दातार व इंदिरा जयसिंग बाजू मांडत आहेत. तर ते रद्द व्हावे यासाठी शांतिभूषण, मुकुल रोहटगी व डॉ.राजीव धवन हे ज्येष्ठ वकील प्रयत्न करणार आहेत.

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय