शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 13:49 IST

"निष्ठावान आणि ज्याने पाच वर्षे नव्हे तर 25-25 वर्षे पक्षाचे काम केल आहे, पक्ष संघटना वाढवली आहे. त्यांना तिकीट देण्याऐवजी आयात करून तिकीट दिली, तर संघटन विस्कळित होण्याची शक्यता आहे. फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले, तर नंतर मात्र संघटन पूर्णपणे सेवाभावी संघटनेऐवजी व्यवसायिक संघटन होईल. "

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्ष राजकीय जुळवाजुळव करताना दिसत आहेत. बंडखोरी करून एका पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत. त्यांना संबंधित पक्ष तिकीटही देत आहेत. आता अशाच मुद्यावरून चंद्रपूर विधानसभा मदारसंघासंदर्भात भाजपमध्ये घमासान सुरू झाल्याचे दिसत आहे. निष्ठावान आणि ज्याने पाच वर्षे नव्हे तर 25-25 वर्षे पक्षाचे काम केल आहे, पक्ष संघटना वाढवली आहे. त्यांना तिकीट देण्याऐवजी आयात करून तिकीट दिली, तर संघटन विस्कळित होण्याची शक्यता आहे. फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले, तर नंतर मात्र संघटन पूर्णपणे सेवाभावी संघटनेऐवजी व्यवसायिक संघटन होईल. म्हणून आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांचे मत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी दिल्लीला चालोलो आहोत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझ्यासोबत बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, "काही राजकीय कामासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांचे मत हे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी मी दिल्लीला चालोलो आहे. त्यांची बाजू मांडण्यापेक्षाही चंद्रपूर विधानसभेच्या संदर्भात कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, ज्यांनी पाच वर्ष काम केले त्यांना तिकीट द्यायला हवे अन्यथा भविष्यात कुणीही कार्यकर्ता संघटन चालवण्यासाठी काम करणार नाही. निष्ठावान, ज्याने पाच वर्ष नव्हे तर 25-25 वर्ष पक्षाचे काम केल आहे, पक्ष संघटना वाढवली.त्यांना तिकीट देण्याऐवजी आयात करून तिकीटं दिली, तर संघटन विस्कळित होण्याची शक्यता आहे."

"ज्या उमेदवारांनी पाच वर्षांत अनेक पक्ष बदलले, त्यांना तिकीट देण्याचा विचार जर पक्ष करत असेल, तर यातून कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण होते आणि पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून ही नाराजी अवगत केली पाहीजे. शेवटी पक्षाने, नेतृत्वाने काय निर्णय करायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण पक्षाच्या नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची नाराजी पोहोचवली नहा, संघटनेच्या संदर्भातला भाव आणि आशय पोहोचवला नाही, फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले, तर नंतर मात्र संघटन पूर्णपणे सेवाभावी संघटनेच्या ऐवजी व्यवसायिक संघटन होईल," असे मुनगंटीवार म्हणाले.

"काल साधारणपणे पाच-सातशे कार्यकर्ते आले, त्यांनी आग्रह केला की, आमची भावना, आम्ही सातशे लोक तर जाऊ शत नाही, पण आमची भावना तुम्ही तरी पोहोचवा. कारण आम्ही तुमच्यासोबत काम करतो आणि तुम्ही जर ही भावना पोहोचली नाही, तर नेत्यांच्या हे लक्षात येणार नाही की, तीव्रता काय आहे? असंतोष काय आहे? मनाची भावना काय आहे? वारंवार निष्ठा बदलणाऱ्यांना, पक्ष बदलणाऱ्यांना आपण तिकीटं दिली, तर उद्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्या महानगर पालिका असेल किंवा कुठलीही निवडणूक असेल, अशाच पद्धतीने निष्ठा बदलेल. एक निष्ठ राहण्याचा तो प्रत्न करणार नाही," असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवारांनी सांगितला मनातला उमेदवार -चंद्रपूरमधून कुणाला तिकीट द्यायला हवे? यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांपैकी द्यायला हवे. प्रामुख्याने ब्रिजभूषण पाझारे यांना द्यायला हवे. कारण 1990 पासून ते काम करत आहेत. ते जिल्हापरिषदेत सभापती होते. पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी जीजी निवडणूक लढवली तीती जिंकली आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांची चांगली वर्तनूक आहे. आता निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर पक्ष राहिला नाही तर..., मी समजू शकतो की एखाद्याला पक्षात घेऊन जर तिकीट दिले, तर ती त्यावेळची गरज असते. पण पाच वर्षांत अनेकदा पक्ष बदलणाऱ्यांना तिकीट देण्याची पद्धत सुरू केली तर त्यातून मात्र कार्यक्रत्यांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होईल आणि पुढे त्या पक्षाला संघटित ठेवणे, कार्यकर्त्यांना संघटित ठेवणे त्यांच्यासमोर भूमिका मांडणे, अवघड होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार