शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:56 IST

नव्वदीच्या उंबरठ्यावर पवारांच्या खांद्याला खांदा लावूल लढले आणि जिंकले

मुंबई : अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जोरदार लढत दिली आणि साताऱ्याची जागा खेचून आणली. उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये 87,717 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झाला. 

लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचे गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य निम्म्याने घटले होते. मात्र, भाजपातून पोटनिवडणूक लढविताना त्यांना धक्कादायक पराभव पहावा लागला. खरेतर सातारा ही छत्रपतींची राजगादी. येथे उदयनराजे प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीत त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला होता. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी लढत दिली होती. मात्र, उदयनराजे भाजपात गेल्याने शिवसेनेने पोटनिवडणुकीपुरती सीट सोडल्याचे सांगितले होते. 

काल लागलेल्या निकालामध्ये उदयनराजेंचा जवऴपास 90 हजार मतांनी पराभव झाला. मात्र, त्यांना आधीच्या निवडणुकांत मिळत असलेले लीड पाहता त्यांच्याविरोधात उभे राहण्यासाठी तुल्यबळ उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नव्हता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनीही माघार घेत नकार दिला. उदयनराजेंसमोर कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न शरद पवारांसमोर उभा होता. पवारांनी त्यांच्याच वयाच्या परममित्राला साद दिली आणि हा माणूस एका पायावर उदयनाराजेंविरोधात लढण्यासाठी तयार झाला.

हा व्यक्ती म्हणजे साताऱ्याचे नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील होय. पाटील हे साताऱ्यातूनच दोनवेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. 2004 आणि 2009 ला ते खासदार झाले होते. याशिवाय जवळपास 35 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले आहे. आघाडीच्या काळात सिक्कीमचे राज्यपालही राहिलेले आहेत. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाटील यांनी शरद पवारांच्या हाकेला होकार दिला. साताऱ्याचा निकाल फिरवला गेला तो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असे बोलले जात आहे. पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. पण उदयनराजेंविरोधात उभे राहताना पाटील यांनी जय-पराजयाचा विचार केला नव्हता. समोर पराभव दिसत होता. पण त्यांनी सहा दशकांच्या मैत्रीखातर पवारांच्या एका शब्दावर खांद्याला खांदा लावून निवडणूक लढविली आणि जिंकली. राजकारण हरले पण मैत्री जिंकली अशीच भावना दिवसभर सातारकरांच्या मनामध्ये होती.  

मैत्री कधीपासून?

शरद पवार यांनी यावर सांगताना आम्ही दोघे कॉलेजपासूनचे मित्र आहोत. काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळात काम केले. नंतर श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत गेले. मी मुख्यमंत्री असताना ते अधिकारी होते. सामाजिक बांधिलकीतून काम करत होते. योग्य अंतर ठेवले. सणावाराला मी त्यांच्या घरी जायचो, ते यायचे. यामुळे आमची मैत्री इतकी वर्षे टिकल्याचे रहस्य शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :satara-pcसाताराSharad Pawarशरद पवारShrinivas Patilश्रीनिवास पाटीलUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019