शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:26 AM

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : तहसीलदार करणार रेतीची व्यवस्था

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना विनामूल्य रेती उपलब्ध होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. दिवाळीपूर्वी आपल्या हक्काच्या घरात जाता येईल, असे लाभार्थ्यांचे स्वप्न होते. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला. जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नव्हती. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ती रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे होते. परिणामी जिल्ह्यातील शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते. ही बाब तुमसर - मोहाडीचे आमदार चरण वाघमारे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. सातत्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. घाटाचे लिलाव बंद असले तरी गरीब लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम प्रलंबित राहू नये यासाठी शासनाने विनामुल्य दोन ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यावरून भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून संबंधित तहसीलदारांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता विनामूल्य रेती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या वाहनाने रेतीची वाहतूक करण्यात येणार आहे, त्या वाहनाचे क्रमांकही अर्जात द्यावे लागतील.या निर्णयामुळे जिल्ह्यातील गरीब, गरजू लाभार्थ्यांना विनामुल्य रेती उपलब्ध होऊन आपल्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहे. परंतु या रेतीघाटांचा लिलाव रखडलेला आहे. मात्र अनेक रेती घाटातून खुलेआम रेतीची तस्करी सुरु आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. या रेती उपशावरही निर्बंध आणण्याची गरज महसूल विभागाला आहे.महिनाभरानंतर लाभार्थ्यांना पत्रप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी रेती मिळण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्या अर्जावरून तहसीलदारांचे पत्र तब्बल महिनाभराने लाभार्थ्यांना मिळाले आहे. विशेष म्हणजे या पत्रात भंडारा तालुक्यात रेती लिलावाबाबत प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आपणास रेती पुरविणे शक्य होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यात गोंधळाची स्थिती झाली आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रेती पुरवठा करण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे तहसीलदारांचे पत्र तब्बल महिनाभराने मिळाल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे.घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य दोन ब्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबत चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळाले. संबंधितांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा. अर्ज करणाºया लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या ८२ लाभार्थ्यांचे रेती मागणीचे अर्ज तहसीलला प्राप्त झाले आहेत.-अक्षय पोयाम, तहसीलदारघरकुल लाभार्थ्यांनी रेतीसाठी अर्ज करावे - आमदार चरण वाघमारेसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रेती घाटाची लिलाव प्रक्रिया व विक्री बंद आहे. त्यामुळे गरीब - गरजू लाभार्थ्यांना रेतीअभावी बांधकाम करणे कठीण झाले. यासाठी तुमसर-मोहाडीचे आमदार चरण वाघमारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यावरून शासनाने घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास मान्यता दिली आहे. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. आता लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावे असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार