शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सोलापूर, उस्मानाबादच्या साखर कारखान्यांकडे चारशे कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:34 IST

८२५ कोटी देणे;  साखर हंगाम बंद होऊन पाच महिने उलटले एफआरपी मिळेना

ठळक मुद्देराज्यातील कारखान्यांनी शेतकºयांचे ८२५ कोटी थकविलेसोलापूर जिल्ह्यात ३१२ कोटी ९२ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८२ कोटी ३७ लाख रुपये थकबाकी काही कारखान्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली

सोलापूर : राज्यातील ७५ साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे ८२५ कोटी ७५ हजार रुपये थकबाकी असून, यापैकी सोलापूरउस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३९५ कोटी २८ लाख रुपये अडकले आहेत. साखर कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही शेतकºयांच्या उसाचे पैसे मात्र मिळाले नाहीत.

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे एफआरपीनुसार २३ हजार १७३ कोटी रुपये शेतकºयांचे देणे आहेत. यापैकी २२ हजार ३६७ कोटी रुपये दिले असून १५ जुलैपर्यंत ८२६ कोटी रुपये शेतकºयांचे देणे आहे. १२० साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपी दिली असून ७५कारखान्यांकडे शेतकºयांच्या उसाचे पैसे देणे आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी ५६ कारखान्यांनी दिली असून, १४ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे.  पाच कारखान्यांनी ६० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली आहे. 

राज्यातील कारखान्यांनी शेतकºयांचे ८२५ कोटी थकविले आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यात ३१२ कोटी ९२ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८२ कोटी ३७ लाख रुपये थकबाकी आहे. हंगाम  संपल्याने कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र शेतकºयांना उसाचे पैसे मिळत नाहीत. काही कारखान्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली असून, केंद्र व राज्य शासनाकडून येणारी रक्कम थकल्याने संपूर्ण एफआरपी देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते.

साखरेला उठाव नसल्याने एफआरपी थकली आहे. शासनानेच शेतकºयांचे पैसे देण्यास सवलत दिली आहे. मागील १५ दिवसात काही रक्कम शेतकºयांना दिली आहे. एफआरपीच्या दोन टक्के रक्कम देणे आहे. ती कारखान्याकडून शेतकºयांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयOsmanabadउस्मानाबाद