शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला

By admin | Updated: May 30, 2016 04:16 IST

मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला.

डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील रिअ‍ॅक्टर स्फोटानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेले मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला. येथील मातीचे ढिगारे उपसण्याचे काम रविवारी संपल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.रविवारी पहाटेपर्यंत घटनास्थळावरील पोकलेन, जेसीबीसह सर्व साधनसामग्री-अधिकारी, कर्मचारी परतले. त्यामुळे आता केवळ निवडक पोलीस, अग्निशमन दलाचे पथक तैनात केलेले आहे. स्फोटात जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गेले दोन-तीन दिवस अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डात हलवले आहे. त्यामुळे आता कुणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी स्मिता रोडे यांनी दिली.प्रोबेस कंपनीशेजारील केमिकल कंपन्यावगळता अन्य कंपन्यांचे कामकाज रविवारपासून सुरू झाले. ज्या कंपन्यांचे खूप नुकसान झाले आहे, तेथील कामगार तुटलेले पत्रे, खुर्च्या, टेबल, पंखे, संगणक, फ्रीज हे सामान गोळा करीत होते. आणखी तीन-चार दिवस हे काम सुरू राहणार आहे.कंपन्यांमधील कामगारांखेरीज अन्य कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नव्हता. कुतूहलापोटी येणाऱ्यांना पोलीस मज्जाव करीत होते. पंचनामा करण्यासाठी नेमलेल्या चार-पाच पथकांनी तीन दिवसांनी सुटी घेतल्याने रविवारी पंचनामा कक्षात माहिती संकलनाचे काम सुरू होते. दुपारी साडेतीनपर्यंत ११ जणांचा पंचनामा केला गेला. घटनेपासून तीन दिवस घर बंद ठेवून ते बाहेर गेले होते. आवश्यकता असल्यास सोमवार-मंगळवारी आणखी काही पंचनामे करू, असे कक्षाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी गेले तीन दिवस ५०० मीटर परिसरातील रहिवाशांना घरे सोडून जाण्यास सांगितले होते. रविवारी प्रथमच ते दिवसभर घरी होते. दिवसभर घराची आवराआवर केली. स्फोटाने उद्ध्वस्त झालेले संसार पाहून अनेक गृहिणींच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.>चोरीच्या चर्चेला उधाणस्फोटानंतर भयभीत रहिवासी घराबाहेर पडले, तेव्हा किमान १५ ते २० घरांतील मुद्देमाल चोरीस गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. काही वाहिन्यांवरही तशी वृत्ते झळकली. मात्र, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांनी त्यास दुजोरा दिला नाही.घटनास्थळी असलेली रसायने हलवल्यामुळे धोका पूर्णपणे टळला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून अग्निशमन दल व महापालिकेचे पथक तैनात केले आहे. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे व काही शंका असल्यास मदत कक्षाशी संपर्क साधावा. - प्रसाद उकर्डे, प्रांताधिकारी