शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला

By admin | Updated: May 30, 2016 04:16 IST

मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला.

डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील रिअ‍ॅक्टर स्फोटानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेले मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला. येथील मातीचे ढिगारे उपसण्याचे काम रविवारी संपल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.रविवारी पहाटेपर्यंत घटनास्थळावरील पोकलेन, जेसीबीसह सर्व साधनसामग्री-अधिकारी, कर्मचारी परतले. त्यामुळे आता केवळ निवडक पोलीस, अग्निशमन दलाचे पथक तैनात केलेले आहे. स्फोटात जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गेले दोन-तीन दिवस अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डात हलवले आहे. त्यामुळे आता कुणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी स्मिता रोडे यांनी दिली.प्रोबेस कंपनीशेजारील केमिकल कंपन्यावगळता अन्य कंपन्यांचे कामकाज रविवारपासून सुरू झाले. ज्या कंपन्यांचे खूप नुकसान झाले आहे, तेथील कामगार तुटलेले पत्रे, खुर्च्या, टेबल, पंखे, संगणक, फ्रीज हे सामान गोळा करीत होते. आणखी तीन-चार दिवस हे काम सुरू राहणार आहे.कंपन्यांमधील कामगारांखेरीज अन्य कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नव्हता. कुतूहलापोटी येणाऱ्यांना पोलीस मज्जाव करीत होते. पंचनामा करण्यासाठी नेमलेल्या चार-पाच पथकांनी तीन दिवसांनी सुटी घेतल्याने रविवारी पंचनामा कक्षात माहिती संकलनाचे काम सुरू होते. दुपारी साडेतीनपर्यंत ११ जणांचा पंचनामा केला गेला. घटनेपासून तीन दिवस घर बंद ठेवून ते बाहेर गेले होते. आवश्यकता असल्यास सोमवार-मंगळवारी आणखी काही पंचनामे करू, असे कक्षाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी गेले तीन दिवस ५०० मीटर परिसरातील रहिवाशांना घरे सोडून जाण्यास सांगितले होते. रविवारी प्रथमच ते दिवसभर घरी होते. दिवसभर घराची आवराआवर केली. स्फोटाने उद्ध्वस्त झालेले संसार पाहून अनेक गृहिणींच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.>चोरीच्या चर्चेला उधाणस्फोटानंतर भयभीत रहिवासी घराबाहेर पडले, तेव्हा किमान १५ ते २० घरांतील मुद्देमाल चोरीस गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. काही वाहिन्यांवरही तशी वृत्ते झळकली. मात्र, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांनी त्यास दुजोरा दिला नाही.घटनास्थळी असलेली रसायने हलवल्यामुळे धोका पूर्णपणे टळला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून अग्निशमन दल व महापालिकेचे पथक तैनात केले आहे. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे व काही शंका असल्यास मदत कक्षाशी संपर्क साधावा. - प्रसाद उकर्डे, प्रांताधिकारी