शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

बाळासाहेबांचा आदेश अन् नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदारानं ठाकरेंची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 15:56 IST

१९९० ते २०१४ पर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले. २०१४ मध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला. त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते. 

मुंबई - आगामी निवडणुकींसाठी शिवसेना ठाकरे गटानं जोरदार कंबर कसली आहे. त्याचसाठी आज उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत. याठिकाणी जनसंवादच्या माध्यमातून उद्धव ठाकरे लोकांना संबोधित करत आहेत. मात्र याचवेळी ठाकरे गटाला भारतीय जनता पार्टीने मोठा धक्का दिला आहे. तब्बल २५ वर्ष शिवसेनेत आमदार असणाऱ्या सूर्यकांत दळवी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. 

सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. २०१४ च्या निवडणुकीत पक्षातील अंतर्गत वादातून त्यांचा पराभव झाल्याचे ते बोलत होते. त्यानंतर २०१९ मध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. तेव्हापासून सूर्यकांत दळवी नाराज होते. आज उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाजपाने कोकणातील सूर्यकांत दळवी यांना पक्षात प्रवेश देत ठाकरेंना धक्का दिला आहे. 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सूर्यकांत दळवींना उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा होती. परंतु दापोली मतदारसंघाची जबाबदारी दळवींचे कट्टर विरोधक अनंत गीतेंकडे सोपवली त्यानंतर दळवींची नाराजी आणखी वाढली. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी ठाकरे गटाच्या कार्यक्रमापासून लांब राहत होते. अखेर सूर्यकांत दळवींनी नाराजीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. परंतु दापोली मतदारसंघात या जागी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. त्यामुळे सूर्यकांत दळवींना या मतदारसंघात भाजपा ताकद देणार का हा प्रश्न आहे. 

बाळासाहेबांच्या आदेशावरून नोकरी सोडली अन्...

सूर्यकांत दळवी हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. १९९० मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून मुंबईतील भारत पेट्रोलियम कंपनीतील नोकरी सोडून दळवी थेट रत्नागिरीतील दापोलीत दाखल झाले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सूर्यकांत दळवी यांनी कोकणातील रत्नागिरी इथं शिवसेना रुजवण्याचं काम केले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी सूर्यकांत दळवींना संधी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात दळवी आमदार झाले. १९९० ते २०१४ पर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले. २०१४ मध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला. त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा