शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"भारताची प्रगतीकडे होणारी वाटचाल रोखण्याचं काम परदेशी माध्यमे करतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:18 IST

Lokmat National Media Conclave: माध्यमे समाजाचा आरसा आहेत. परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी आहे

नागपूर - परदेशी माध्यमे भारताची विकसित देशाकडे होणारी वाटचाल रोखण्याचा प्रयत्न करतंय. कुणी असा प्रपोगेंडा बनवत आहे का? मोदींच्या नेतृत्वात जगात आर्थिकदृष्ट्या ५ व्या नंबरवर भारत आहे हे अन्य कुणाला बघवत नाही. भारताने कोरोना लस उत्पादित कशी केली? ६० कोटी लोकांना वर्षाला आरोग्य सुविधा मोफत कशी दिली जाते? डिजिटल युगाकडे भारत जातोय. हे सत्य आहे जे काही देशांना पाहावत नाही. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. यामागे नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला हवं असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडले. 

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वोच्च न्यायालयापासून देशातील कनिष्ठ न्यायालयानं एखाद्या प्रकरणावर निकाल दिला असताना जुन्या बातम्या काढून आजही प्रश्न उपस्थित केले जाते. विश्वासार्हता कुणाची राहिली? एक अजेंडा बनवून चॅनेल काम करते. देशातील राजधानीत देशाचे तुकडे करणाऱ्यांना हिरो बनवले गेले. भारताचे तुकडे करण्याचे नारे जिथे लागत होते. तिथे दिग्गज नेते त्यांच्यासोबत उभे राहायचे. लोकांपर्यंत बातमी पोहचवण्याचं केवळ वृत्तपत्र, चॅनेल एकच माध्यम नाही. तर डिजिटल माध्यमेही आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच सत्य काय आणि खोटे काय हे फॅक्टचेक करण्याचं काम सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून केले जाते. माध्यमांमधूनही फॅक्टचेक होऊ लागले. काही राजकीय पक्ष जनतेच्या विकासासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा गुणगान गाण्यासाठी निधी ठेवतात. संसदेचा आधार घेत भारताच्या पंतप्रधान यांच्याविरोधात अपशब्द वापरले जातात. २०१६ मध्ये मोदींच्या डिग्रीबद्दल सर्व खुलासा केला असताना २०२३ मध्ये हा प्रश्न विचारणाऱ्यांना माध्यमांनी सवाल उपस्थित का केला नाही. माध्यमांनी रिसर्च करणे बंद केले का? सोशल मीडियात जुने रेकॉर्ड टाकले जातात. माध्यमांची भूमिका सोशल मीडियात निभावते असं मंत्री ठाकूर यांनी सांगितले. लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. 

दरम्यान, इंदिरा गांधींच्या आणीबाणीसारखी परिस्थिती नाही. नवी आव्हाने उभी आहेत. माध्यमे समाजाचा आरसा आहेत. परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी आहे. ६० वर्षात शिक्षण प्रणाली कशी होती. अघोषित माध्यमांवर दबाव कसा होता. भारतीय विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांना जाणुनबुजून बाजूला ठेवले. एकच बाजू शिकवली जायची. दुसऱ्या बाजूचे ज्ञान दिले जात नव्हते. देशातील माध्यमे वेळेनुसार बदलत आहे. ग्राहकांना काय हवं त्यावर निर्भर आहे. रेटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मीडिया ट्रायलनं नुकसान कुणाचे होते? ७५ वर्षात देशात सरकार कुणाचेही असो माध्यमांनी तर्क आणि बातम्या देण्याचं काम केले. यापुढच्या काळातही माध्यमे त्यांची भूमिका निभावतील. मतभेद, मनभेद असतील परंतु क्षमतेची कुठलीही कमी माध्यमांमध्ये नसेल. जे विकू शकेल तीच बातमी आहे असं माध्यमांच्या कार्यालयात म्हटलं जाते. याला जबाबदार कोण? माध्यमांमध्ये अनेक उद्योगपतींचा पैसा लागलाय त्यामुळे हे असू शकते. आता या आव्हानांमधून बाहेर पडण्याचं काम पत्रकारांना करावे लागणार आहे. नव्या आव्हानात गुण-दोष दोन्ही पाहायला हवेत असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं. 

राहुल गांधींना टोलास्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम देशातील मोठ्या घराण्यात जन्माला आलेला नेता करतो. सावरकर बनण्यासाठी त्याग करावा लागतो. तप करावं लागते. जेलमध्ये जावं लागते. मी सावरकर नाही असं म्हणता, तुम्ही सावरकर बनूच शकत नाही. जर तुम्हाला एखाद्याचा सन्मान करता येत नाही अपमान करू नका असा टोला मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना लगावला.