शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

"भारताची प्रगतीकडे होणारी वाटचाल रोखण्याचं काम परदेशी माध्यमे करतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:18 IST

Lokmat National Media Conclave: माध्यमे समाजाचा आरसा आहेत. परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी आहे

नागपूर - परदेशी माध्यमे भारताची विकसित देशाकडे होणारी वाटचाल रोखण्याचा प्रयत्न करतंय. कुणी असा प्रपोगेंडा बनवत आहे का? मोदींच्या नेतृत्वात जगात आर्थिकदृष्ट्या ५ व्या नंबरवर भारत आहे हे अन्य कुणाला बघवत नाही. भारताने कोरोना लस उत्पादित कशी केली? ६० कोटी लोकांना वर्षाला आरोग्य सुविधा मोफत कशी दिली जाते? डिजिटल युगाकडे भारत जातोय. हे सत्य आहे जे काही देशांना पाहावत नाही. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. यामागे नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला हवं असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडले. 

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वोच्च न्यायालयापासून देशातील कनिष्ठ न्यायालयानं एखाद्या प्रकरणावर निकाल दिला असताना जुन्या बातम्या काढून आजही प्रश्न उपस्थित केले जाते. विश्वासार्हता कुणाची राहिली? एक अजेंडा बनवून चॅनेल काम करते. देशातील राजधानीत देशाचे तुकडे करणाऱ्यांना हिरो बनवले गेले. भारताचे तुकडे करण्याचे नारे जिथे लागत होते. तिथे दिग्गज नेते त्यांच्यासोबत उभे राहायचे. लोकांपर्यंत बातमी पोहचवण्याचं केवळ वृत्तपत्र, चॅनेल एकच माध्यम नाही. तर डिजिटल माध्यमेही आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच सत्य काय आणि खोटे काय हे फॅक्टचेक करण्याचं काम सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून केले जाते. माध्यमांमधूनही फॅक्टचेक होऊ लागले. काही राजकीय पक्ष जनतेच्या विकासासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा गुणगान गाण्यासाठी निधी ठेवतात. संसदेचा आधार घेत भारताच्या पंतप्रधान यांच्याविरोधात अपशब्द वापरले जातात. २०१६ मध्ये मोदींच्या डिग्रीबद्दल सर्व खुलासा केला असताना २०२३ मध्ये हा प्रश्न विचारणाऱ्यांना माध्यमांनी सवाल उपस्थित का केला नाही. माध्यमांनी रिसर्च करणे बंद केले का? सोशल मीडियात जुने रेकॉर्ड टाकले जातात. माध्यमांची भूमिका सोशल मीडियात निभावते असं मंत्री ठाकूर यांनी सांगितले. लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. 

दरम्यान, इंदिरा गांधींच्या आणीबाणीसारखी परिस्थिती नाही. नवी आव्हाने उभी आहेत. माध्यमे समाजाचा आरसा आहेत. परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी आहे. ६० वर्षात शिक्षण प्रणाली कशी होती. अघोषित माध्यमांवर दबाव कसा होता. भारतीय विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांना जाणुनबुजून बाजूला ठेवले. एकच बाजू शिकवली जायची. दुसऱ्या बाजूचे ज्ञान दिले जात नव्हते. देशातील माध्यमे वेळेनुसार बदलत आहे. ग्राहकांना काय हवं त्यावर निर्भर आहे. रेटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मीडिया ट्रायलनं नुकसान कुणाचे होते? ७५ वर्षात देशात सरकार कुणाचेही असो माध्यमांनी तर्क आणि बातम्या देण्याचं काम केले. यापुढच्या काळातही माध्यमे त्यांची भूमिका निभावतील. मतभेद, मनभेद असतील परंतु क्षमतेची कुठलीही कमी माध्यमांमध्ये नसेल. जे विकू शकेल तीच बातमी आहे असं माध्यमांच्या कार्यालयात म्हटलं जाते. याला जबाबदार कोण? माध्यमांमध्ये अनेक उद्योगपतींचा पैसा लागलाय त्यामुळे हे असू शकते. आता या आव्हानांमधून बाहेर पडण्याचं काम पत्रकारांना करावे लागणार आहे. नव्या आव्हानात गुण-दोष दोन्ही पाहायला हवेत असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं. 

राहुल गांधींना टोलास्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम देशातील मोठ्या घराण्यात जन्माला आलेला नेता करतो. सावरकर बनण्यासाठी त्याग करावा लागतो. तप करावं लागते. जेलमध्ये जावं लागते. मी सावरकर नाही असं म्हणता, तुम्ही सावरकर बनूच शकत नाही. जर तुम्हाला एखाद्याचा सन्मान करता येत नाही अपमान करू नका असा टोला मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना लगावला.