शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:57 IST

विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे असंही रणजित सावरकर म्हणाले.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान राहुल गांधींनी केला आहे. त्यासाठी त्यांना माफी मागायला भाग पाडा, अन्यथा तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी मागणी वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली  आहे. राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादाच्या मुद्द्यावर सावरकर कुटुंबाने स्पष्ट भूमिका मांडली. 

रणजित सावरकर म्हणाले की, सावरकर यांचा वापर राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींकडून केला जातोय. सावरकर हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यांच्यावर आरोप केले तर मुस्लिमांची मते मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशाप्रकारे उपयोग होणे गंभीर आहे. काँग्रेससोबत असणारे पक्षही सावरकरांचा वापर करतायेत. बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा उपलब्ध दिली. मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले परंतु आज त्यांचा वारसा असणारे आज जी भूमिका घेतायेत ते दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच सावरकरांचा आदर बाळगणारे लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत परंतु ते आवाज उचलत नाही. शिवसेनेत फूट पडल्याचे दु:ख आहे. शिवसेना जी बोटचेपी भूमिका घेत होती त्यावर अनेक शिवसैनिक नाराज होते. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली ती स्वागतार्ह आहे. परंतु ते स्वत: मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या शिदोरी मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत सावरकरांवर लिखाण करण्यात आले. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं, भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्री असताना ते कारवाई करू शकले असते. तेव्हा ती मान्य केली. तुमच्याबाबत सावरकरांबद्दल प्रेम पण कृतीत उतरत नाही तोवर त्याला अर्थ नाही असा टोलाही रणजित सावरकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल गांधींचा आहे. मुस्लीमांचे लांगुनचालून करण्याचं राजकारण काँग्रेस करतेय. जो कुणी सावरकरांचा अपमान झाल्यानंतर मैदानात उतरतो त्याला सावरकरवादी मी मानतो. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असू शकते तसे काँग्रेस नेत्यांच्या मनातही आहे. परंतु ते कृतीत दिसत नाही तोवर त्यांचं बोलणं व्यर्थ आहे. काँग्रेस त्यांच्या भूमिकेपासून दूर होत नाही असं रणजित सावरकर म्हणाले. 

शरद पवारांचे मत स्वागतार्ह विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे. १९८९ मध्ये शरद पवारांनी जे भाषण केले होते ते अतिशय योग्य आहे. सावरकरांचा अपमान करू नका म्हणणं आणि त्यांच्या मित्रांकडून सातत्याने अपमानास्पद बोलणे हे सर्व नुराकुस्ती आहे. सावरकरांचा अपमान झाल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणे गरजेचे आहे. जर खरोखरच सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडून माफी मागायला हवं. सावरकरांनी माफी मागितली हे सिद्ध करणारे एकतरी पत्र दाखवावं असं आव्हान रणजित सावरकरांनी राहुल गांधींना केले. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी