शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:47 IST

दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासामॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधीबारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे

बारामती : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन निर्णयान्वये जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. परिणामी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्या ऑगस्टअखेर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात अद्याप मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढविण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. बुधवारी(दि. ३१) चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. राज्यात दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे आहेत. बारामती दूध संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, बारामती खरेदी विक्री संघ, खंडू खैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान, धो.आ. सातव उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत...चारा टंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले की, येथील पशुउत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शेतकºयांनी याबाबत  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पवार यांनी राज्य पातळीवर केलेल्या मागणीला यश आले आहे. यापूर्वी देखील जूनअखेर असणारी चारा छावणीची मुदत पवार यांच्या मागणीमुळे वाढवून मिळाल्याचे होळकर म्हणाले. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार