शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:47 IST

दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासामॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधीबारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे

बारामती : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन निर्णयान्वये जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. परिणामी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्या ऑगस्टअखेर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात अद्याप मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढविण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. बुधवारी(दि. ३१) चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. राज्यात दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे आहेत. बारामती दूध संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, बारामती खरेदी विक्री संघ, खंडू खैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान, धो.आ. सातव उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत...चारा टंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले की, येथील पशुउत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शेतकºयांनी याबाबत  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पवार यांनी राज्य पातळीवर केलेल्या मागणीला यश आले आहे. यापूर्वी देखील जूनअखेर असणारी चारा छावणीची मुदत पवार यांच्या मागणीमुळे वाढवून मिळाल्याचे होळकर म्हणाले. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार