शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

Maharashtra Election 2019 : 'अब की बार २२० पार' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचा मतदानानंतर नवा आकडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 17:55 IST

महायुतीचे ‘अब की बार २२० पार’ हे आता २५० टचपर्यंत मजल मारणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहाच्या दहा जागा येतील, बंडखोरीचा काही परिणाम होणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देराज्यात महायुतीची मजल  आता २५० जागांपर्यंत : चंद्रकांत पाटीलपुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार

कोल्हापूर : महाराष्ट्रात ‘अब की बार २२० पार’, असा नारा मी भाजपचा राज्य अध्यक्ष झाल्यानंतर दिला होता. त्याला लोकसभेला २२७ जागांवर युती पुढे असल्याचा आधार होता. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या तीन मोठ्या निर्णयांचे लोकांना अप्रूप आहे. त्यामुळे महायुतीचे ‘अब की बार २२० पार’ हे आता २५० टचपर्यंत मजल मारणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहाच्या दहा जागा येतील, बंडखोरीचा काही परिणाम होणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि संयमी आहेत. कुठलीही आव्हाने आली, तरी विचलित ते होत नाहीत. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेही मंत्री पाटील यांंनी यावेळी स्पष्ट केले.पालकमंत्री पाटील यांनी दुपारी पावणेचारच्या सुमारास तपोवन परिसरातील शीलादेवी डी. श्ािंदे सरकार हायस्कूलमधील मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोथरुडमध्ये मी स्वत: विधानसभेचा उमेदवार असूनही सकाळ पूर्ण कोथरुडमध्ये दिली. तेथील सर्व केंद्रांवर जाऊन मतदारांना भेटून मी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी कोल्हापूरला आलो. वेळेत येऊन मतदान केल्याचा मला खूप आनंद असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. पुणे, मुंबईतील नोकरदार मतदानासाठी बाहेर पडले.

यावेळी एकूण चित्र पाहता महाराष्ट्रातील निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. १ कोटी ७० लाख लोक असे आहेत की, ज्यांना सरकारकडून काही ना काही लाभ मिळाला आहे. त्यामुळे ते नतद्रष्ट नाहीत. आपला कोणी मित्र उभा आहे म्हणून ते भाजप-शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत. परळीबाबत बोलायचे झाले, तर इतक्या खालच्या पातळीला महाराष्ट्रातील राजकारण आणि प्रचार येणे योग्य नाही. बहीण-भावाचे नाते राजकारणामुळे बिघडणार असेल, तर ते चांगले नाही. त्यामुळे मी आणि मुख्यमंत्र्यांनी परळीतील या प्रकाराबाबत निषेधाचे संयुक्त पत्रक काढले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात युती ५० जागा जिंकेलआता गोपीचंद पडळकर यांनी चांगली लढत दिली आहे. अजित पवार यांना त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यास ते यशस्वी ठरले आहेत. पडळकर यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने बघूया आता काय होते. सन २०२४ मधील बारामती लोकसभेतील विजयाचे ध्येय असणार आहे. सातारा येथील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागा निवडून येतील. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी ५० जागा युती जिंकेल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.कोथरुडमधील लढत वन-वे, मीच विजयी होईनकोथरुडमधील लढत वन-वे असून त्याठिकाणी मी विजयी होईन. याठिकाणी १ लाख ६० हजारांच्या मार्जिनने मतदानाची मोजणी सुरू होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये आपला पक्ष कसा चांगला, आपली ध्येयधोरणे कोणती, आपण भविष्यात काय करणार हे मांडणे पुरेसे आहे. तो कसा वागला, हा कसा वागला हे सांगण्याची गरज नाही. त्याऐवजी हातवारे काय करता, खालची भाषा काय करता. पावसात भिजल्याने आदर वाढतो, मते मिळत नाहीत, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरkothrud-acकोथरुड