शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:14 IST

मराठवाड्यातील १२९ मंडळांत रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी; सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतही हाहाकार, ७० लाख एकरांवरील पिकांचा चिखल, बांधा-बांधावर आसवांचा महापूर

गोविंद इंगळेमुंबई : राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः  हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हाती आलेली पिके मातीमोल झाली आहेत. ‘भर पावसात उभे गाव ओस झाले...’ अशी स्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागली आहे.  

नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘गंगामाई पाहुणी आली, घरट्यात गेली राहून...’ अशी अवस्था झालेल्या शेतकऱ्यांचा कणा याही बिकट स्थितीत ताठ राहावा, यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांना मदत देऊन जगण्याची उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना...

यंदा पाऊस काळ चांगला आहे म्हणून ऐकलं होतं. त्यामुळे हिंमत करून बँकेचे कर्ज काढले. कांदा लावला. द्राक्षही चांगले पैसे देईल वाटले. मात्र, एकाच पावसाने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. रानात नीट मातीही शिल्लक राहिली न्हाय. पावसापूर्वी जोमाने डोलणारे पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना, अशा शब्दांत चिंचपूर ढगे (जि. धाराशिव) येथील शेतकरी चंद्रकांत रामभाऊ मोरे यांनी आपली व्यथा मांडली. बाणगंगा नदीच्या पुरात त्यांची ३ एकर ३० गुंठे शेती खरडून वाहून गेली.  त्यांची १ एकर द्राक्षबाग, अर्धा एकर कांदा व २ एकर १० गुंठे सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले. मोरे यांच्यावर १ लाख २५ हजार रुपयांचे बँकेचे कर्जही आहे.  

अडीच एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह; आता जगावे कसे? 

“मायबाप सरकार, माझं कसं होणार? माझं कुटुंब काय खाणार?” असा हंबरडा गुंजरगा येथील कांता जीवन शिंदे या वृद्ध महिलेने फोडला. महापुरात त्यांच्या जनावरांसह सर्वस्व वाहून गेले. हताश होऊन त्यांनी तेरणा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील काही युवकांच्या तत्परतेमुळे आजीबाईंचा जीव वाचला. तेरणा नदीच्या पुराचे पाणी शेतात व घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले. कांताबाईंच्या शेळ्या, म्हशी, कोंबड्या वाहून गेल्या. शेती पाण्याखाली गेली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कोलमडला. यातून बाहेर पडता येणार नाही, या नैराश्यातून त्यांनी थेट नदीकाठी धाव घेतली. कांताबाई शिंदे यांना दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून केवळ अडीच एकर शेत आहे. या शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत आल्याने आजीबाईंनी हा पवित्रा घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी