शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:14 IST

मराठवाड्यातील १२९ मंडळांत रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी; सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतही हाहाकार, ७० लाख एकरांवरील पिकांचा चिखल, बांधा-बांधावर आसवांचा महापूर

गोविंद इंगळेमुंबई : राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः  हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हाती आलेली पिके मातीमोल झाली आहेत. ‘भर पावसात उभे गाव ओस झाले...’ अशी स्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागली आहे.  

नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘गंगामाई पाहुणी आली, घरट्यात गेली राहून...’ अशी अवस्था झालेल्या शेतकऱ्यांचा कणा याही बिकट स्थितीत ताठ राहावा, यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांना मदत देऊन जगण्याची उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना...

यंदा पाऊस काळ चांगला आहे म्हणून ऐकलं होतं. त्यामुळे हिंमत करून बँकेचे कर्ज काढले. कांदा लावला. द्राक्षही चांगले पैसे देईल वाटले. मात्र, एकाच पावसाने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. रानात नीट मातीही शिल्लक राहिली न्हाय. पावसापूर्वी जोमाने डोलणारे पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना, अशा शब्दांत चिंचपूर ढगे (जि. धाराशिव) येथील शेतकरी चंद्रकांत रामभाऊ मोरे यांनी आपली व्यथा मांडली. बाणगंगा नदीच्या पुरात त्यांची ३ एकर ३० गुंठे शेती खरडून वाहून गेली.  त्यांची १ एकर द्राक्षबाग, अर्धा एकर कांदा व २ एकर १० गुंठे सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले. मोरे यांच्यावर १ लाख २५ हजार रुपयांचे बँकेचे कर्जही आहे.  

अडीच एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह; आता जगावे कसे? 

“मायबाप सरकार, माझं कसं होणार? माझं कुटुंब काय खाणार?” असा हंबरडा गुंजरगा येथील कांता जीवन शिंदे या वृद्ध महिलेने फोडला. महापुरात त्यांच्या जनावरांसह सर्वस्व वाहून गेले. हताश होऊन त्यांनी तेरणा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील काही युवकांच्या तत्परतेमुळे आजीबाईंचा जीव वाचला. तेरणा नदीच्या पुराचे पाणी शेतात व घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले. कांताबाईंच्या शेळ्या, म्हशी, कोंबड्या वाहून गेल्या. शेती पाण्याखाली गेली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कोलमडला. यातून बाहेर पडता येणार नाही, या नैराश्यातून त्यांनी थेट नदीकाठी धाव घेतली. कांताबाई शिंदे यांना दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून केवळ अडीच एकर शेत आहे. या शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत आल्याने आजीबाईंनी हा पवित्रा घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी