शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:14 IST

मराठवाड्यातील १२९ मंडळांत रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी; सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतही हाहाकार, ७० लाख एकरांवरील पिकांचा चिखल, बांधा-बांधावर आसवांचा महापूर

गोविंद इंगळेमुंबई : राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः  हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हाती आलेली पिके मातीमोल झाली आहेत. ‘भर पावसात उभे गाव ओस झाले...’ अशी स्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागली आहे.  

नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘गंगामाई पाहुणी आली, घरट्यात गेली राहून...’ अशी अवस्था झालेल्या शेतकऱ्यांचा कणा याही बिकट स्थितीत ताठ राहावा, यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांना मदत देऊन जगण्याची उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना...

यंदा पाऊस काळ चांगला आहे म्हणून ऐकलं होतं. त्यामुळे हिंमत करून बँकेचे कर्ज काढले. कांदा लावला. द्राक्षही चांगले पैसे देईल वाटले. मात्र, एकाच पावसाने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. रानात नीट मातीही शिल्लक राहिली न्हाय. पावसापूर्वी जोमाने डोलणारे पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना, अशा शब्दांत चिंचपूर ढगे (जि. धाराशिव) येथील शेतकरी चंद्रकांत रामभाऊ मोरे यांनी आपली व्यथा मांडली. बाणगंगा नदीच्या पुरात त्यांची ३ एकर ३० गुंठे शेती खरडून वाहून गेली.  त्यांची १ एकर द्राक्षबाग, अर्धा एकर कांदा व २ एकर १० गुंठे सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले. मोरे यांच्यावर १ लाख २५ हजार रुपयांचे बँकेचे कर्जही आहे.  

अडीच एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह; आता जगावे कसे? 

“मायबाप सरकार, माझं कसं होणार? माझं कुटुंब काय खाणार?” असा हंबरडा गुंजरगा येथील कांता जीवन शिंदे या वृद्ध महिलेने फोडला. महापुरात त्यांच्या जनावरांसह सर्वस्व वाहून गेले. हताश होऊन त्यांनी तेरणा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील काही युवकांच्या तत्परतेमुळे आजीबाईंचा जीव वाचला. तेरणा नदीच्या पुराचे पाणी शेतात व घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले. कांताबाईंच्या शेळ्या, म्हशी, कोंबड्या वाहून गेल्या. शेती पाण्याखाली गेली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कोलमडला. यातून बाहेर पडता येणार नाही, या नैराश्यातून त्यांनी थेट नदीकाठी धाव घेतली. कांताबाई शिंदे यांना दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून केवळ अडीच एकर शेत आहे. या शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत आल्याने आजीबाईंनी हा पवित्रा घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी