शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

बीडच्या चारदरी गावात वीज कोसळून पाच जण ठार, आठ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 6:15 PM

धारूर तालुक्यातील चारदरी येथे शनिवारी सायंकाळी वीज पडून पाच जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले.

धारूर - बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चारदरी येथे शनिवारी सायंकाळी वीज पडून पाच जण ठार झाले. माजलगाव तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण सहा ठार झाले. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले तर पाच गंभीर भाजले. दुस-या घटनेत माजलगाव तालुक्यातील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी या दुर्देवी घटना घडल्या. जखमींवर धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आसाराम रघुनाथ आघाव (२८), उषा आसाराम आघाव (२५), दिपाली मच्छींद्र घोळवे (२१), शिवशाला विठ्ठल मुंडे (२१), वैशाली संतोष मुंडे (२५) अशी वीज कोसळून ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुमन भगवान तिडके (४५), रुक्मिण बाबासाहेब घोळवे (५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (२५), सुरेखा आबासाहेब आघाव (१७) हे गंभीर भाजले आहेत. या जखमींवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत . दरम्यान, हे सर्वजण शेतात बाजरी काढण्याचे काम करीत होते. पाऊस आल्याने त्यांनी झाडाचा आडोसा घेतला होता. याचवेळी ही दुर्देवी घटना घडली.

दरम्यान, शनिवारी माजलगाव, धारूर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस पडत असलेल्याने आडोसा म्हणून झाडाखाली थांबलेल्या या सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

माजलगावात महिला ठारमाजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात शेतात काम करणा-या राधाबाई दामोधर कोळसे (५५) महिलेचाही वीज कोसळून मृत्यू झाला.