शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

‘पेगॅसस स्पायवेअर’साठी ५ अधिकारी गेले हाेते इस्त्रायलच्या दौऱ्यावर, वकिलाच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 12:18 PM

Pegasus spyware: फोन टॅपिंग प्रकरण आणि इस्त्रायल दौरा यांचा संबंध असल्याचे आता जनतेला माहीत आहे. हा दौरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया डावलून संबंधित अधिकाऱ्यांनी हा दौरा केल्याचे लक्ष्मण बरा व दिगंबर यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.

मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना २०१९मध्ये मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागात काम करणाऱ्या पाच अधिकाऱ्यांच्या इस्त्रायल दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला नोटीस बजावली. पेगॅसससारखे स्पायवेअर तंत्रज्ञान राज्यात आणण्यासाठी हा दौरा करण्यात आल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.फोन टॅपिंग प्रकरण आणि इस्त्रायल दौरा यांचा संबंध असल्याचे आता जनतेला माहीत आहे. हा दौरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया डावलून संबंधित अधिकाऱ्यांनी हा दौरा केल्याचे लक्ष्मण बरा व दिगंबर यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.इस्त्रायल वेब मीडिया (या विषयाचा अभ्यास करण्याचे कारण देत दौरा करण्यात आला होता.) फारसा तज्ज्ञ देश नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना कोणताच फायदा होणार नव्हता. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व अधिकाऱ्यांना पेगॅसस स्पायवेअर सॉफ्टवेअर आणण्यासाठी पाठविण्यात आले होते, असे याचिकाकर्त्यांचे वकील तेजस दांडे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी राज्य सरकार, डीजीपीआयआर, संबंधित पाच अधिकाऱ्यांना चार आठवड्यांत जनहित याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर डीजीपीआयआरच्या निवडक पाच अधिकाऱ्यांना इस्त्रायलला पाठविण्यात आले. मात्र, हा दौरा करण्यापूर्वी आवश्यक असलेली परवानगी घेतली नाही. मुख्यमंत्री, केंद्र सरकार किंवा भारतीय निवडणूक आयोगाची आवश्यक असलेली परवानगी न घेता हा दौरा करण्यात आला. या दौऱ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.‘इस्त्रायल कृषी तंत्रज्ञानात तज्ज्ञ आहे. पण हा दौरा वेब मीडियाच्या वापराबाबत होता. या दौऱ्याला मंजुरी देणे, यावरूनच या दौऱ्याचा हेतू समजतो. या दौऱ्यासाठी सरकारी तिजोरीतून १४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते,’ असे याचिकेत म्हटले आहे. 

सरकारची मंजुरी नव्हती  माहितीच्या अधिकाराखालील माहितीनुसार, या दौऱ्याचा आराखडा घाईने तयार करण्यात आला असला व अनेक नियमांचे उल्लंघन केले असले तरी या दौऱ्याला सरकारने मंजुरी दिली नव्हती, असेही याचिकेत म्हटले आहे..

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMumbaiमुंबई