शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पाच महिन्यांत ४७२ लाचखोर जाळ्यात

By admin | Published: June 07, 2016 8:43 PM

आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई :पोलीस आणि महसूल खाते आघाडीवरचसोलापूर : आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़ उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमविणारे आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील सरकारी कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे़ लाचखोरांमुळे सर्वसामांन्याची होणारी पिळवणूक तसेच शासकीय-निमशासकीय कामासाठी सामांन्याची पदोपदी होणारी अडवणूक वाढत असल्याने स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी बाबुंना लाच देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा लाचखोरांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गत पाच महिन्यामध्ये केलेल्या सापळा कारवाईत ४६३ लाचखोरांना पकडले आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमविणारे व इतर भ्रष्टाचार प्रकरणातील ८ अशा एकूण ४७२ लाचखोरांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे १० कोटी ९० लाख ६ हजार २५३ रूपये एवढी मालमत्ता हस्तगत करण्याची कारवाई केली आहे.विभागनिहाय लाचखोरांची संख्यामुंबई : ३७ठाणे : ५५पुणे : ८३नाशिक : ६०नागपूर : ६१अमरावती : ५१औरंगाबाद : ७८नांदेड : ४७एकूण : ४७२़वर्षनिहाय लाचखोरांची संख्या२०१० : ५२८२०११ : ५१२२०१२ : ५१४२०१३ : ६०४२०१४ : १३१६२०१५ : १२७९२०१६ जूनअखेर : ४७२लाचखोर खातेनिहायमहसुल १४५, पोलीस १३८, म़रा़वि़मं २३, महानगरपालिका २७, पंचायत समिती ५९, वनविभाग २२, आरोग्य विभाग २०, शिक्षण विभाग ३६, आरटीओ ८, पाणीपुरवठा ६, बांधकाम विभाग ५, विधी व न्यायविभाग ७, समाजकल्याण विभाग ८, कृषी विभाग ७ व अन्य़२०१६ मधील ३८१ प्रकरणे प्रलंबितसन २०१६ या सालात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचखोरीत पकडलेल्या ४७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ यातील ३८१ प्रकरणे प्रलंबित आहेत़ यातील १८ प्रकरणाचे दोषारोप दाखल करण्यात आले आहेत़ बदनामीनंतरही लाचखोरीत वाढलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी व्हावी व त्यातून असे प्रकार थांबावेत या उद्देशाने सोशल मिडियाचा आधार घेतला़ लाचखोरीत सापडलेल्यांचे फेसबुकवर छायाचित्र प्रसिध्द करून त्याची बदनामी करण्याच्या हेतू लाचलुचपत विभागाचा होता़ मात्र बदनामीनंतरही लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे सोशल मिडियावर बदनामी करण्याचा फंडा फेल जातो की काय अशी आशा निर्माण झाली आहे़ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मानसिकतेमुळे लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ सर्वसामान्यकडून लाच स्वीकारणाऱ्या बाबुंच्या बदनामीसाठी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे़ शिवाय तक्रारदारांसाठी विविध सेवासुविधा निर्माण करून दिल्यामुळे तक्रारदारांची संख्या वाढली आहे़ लाचखोरांवर जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कटिबध्द आहे़-गणेश जवादवाडउप अधिक्षक, सोलापूर एसीबी़