शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

पाच लाख लोकांना मिळणार कुणबी प्रमाणपत्रे; पुढील पिढ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:01 IST

निजामकालीन १० हजारांवर ‘मराठा- कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ नोंदी सापडल्या

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठवाड्यातील निजामकालीन सुमारे पावणे दोन लाख नोंदी तपासल्या आहेत. यातून १० हजारांवर नोंदी ‘मराठा- कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ अशा सापडल्या आहेत. १९६७ पूर्वीच्या या नोंदी असल्याने त्या एका नोंदीवर पुढील पाच पिढ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. आता सापडलेल्या नोंदींचा लाभ सुमारे पाच लाख लोकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणार आहे. समितीतील एका सदस्यानेही या माहितीला दुजोरा दिला.

समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कशासाठी?

जिल्हानिहाय कागदपत्रे तपासून त्याचा अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी  समितीला सादर करतील. त्यानंतर १२ प्रकारचे अभिलेखे समितीकडून तपासले जाणार. न्यायालयात आरक्षण टिकावे असा अहवाल तयार करणार.

या कागदपत्रांची तपासणी

  • कूळ नोंदवही, खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जन्ममृत्यू रजिस्टर,  शैक्षणिक अभिलेखे, कारागृह, पोलिसांचे रजिस्टर, जिल्हा निबंधन तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडील खरेदीखत, करारखत, साठेखत, भाडेचिठ्ठी, मृत्यूपत्रक, इच्छापत्रक, भूमि अभिलेखातील कागदपत्रे, शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील कागदपत्रे समितीकडून तपासण्यात येत आहेत. 
  • उर्दू, फारसी, मोडी लिपीतील कागदपत्रे तपासण्यासाठी आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून घेतली. ११ मोडी लिपी जाणकार त्याचप्रमाणे उर्दू शिक्षकांचीही मदत घेतली जात आहे.

सर्वपक्षीय खासदारांनी राजीनामे द्यावेत

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसमोर आवाज उठवावा, त्याचाही परिणाम होणार नसेल तर त्यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी राजीनामे द्यावेत. मनोज जरांगे-पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलू नये आणि मराठा तरुणांनी आत्महत्या करू नयेत.-उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

हेमंत पाटील यांचे उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत लोकसभा खासदारकीचा राजीनामा देणारे शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. एआयएमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

ठाकरेंना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही

मराठा आरक्षणावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहे हे मराठा समाजालाही आणि आम्हालाही माहीत आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? यांनी हे आरक्षण टिकवले नाही, मराठा आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात,-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण