शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कांदा अनुदानासाठी सव्वा लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:43 IST

कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. आत्तापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचे बाजार समित्यांकडे अर्ज केले आहेत.

पुणे : कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. आत्तापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचे बाजार समित्यांकडे अर्ज केले आहेत.तसेच अनुदानासाठी अर्ज करण्यास येत्या २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,असे राज्याचे पणन संचालक दिपक तावरे यांनी सांगितले. 

राज्य शासनातर्फे १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये कांद्यांची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानुसार पणन संचालक कार्यालयातर्फे अनुदान वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वंतत्र कक्ष सुरू करण्यात आले. तसेच शेतकºयांना अनुदानासाठीचे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात आले. शासनातर्फे शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनुदानासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच अनुदान अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. परंतु, शेतकºयांना अर्जासोबत जोडावे लागणारे आवश्यक कागदपत्र मिळविण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे पणन संचालक कार्यालयातर्फे २५ जानेवारीपर्यंत मुदत वाढविली आहे.

दिपक तावरे म्हणाले, अनुदान घेण्यासाठी राज्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज करत आहेत. आत्तापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यातील सुमारे ५० हजार अर्ज नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील आहेत. पुणे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सुमारे १५ ते २० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. तर उर्वरित जिल्ह्यात ५ ते १० हजार शेतक-यांनी अर्ज केले आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करून अनुदानाचा लाभ घ्यावा.

राज्यातील सुमारे २ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता पणन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे १५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. राज्यातील १७ जिल्ह्यातील तब्बल ७५ लाख क्विंटल कांद्यासाठी या अनुदानाचे वाटप करावे लागणार आहे, असेही पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :onionकांदाagricultureशेतीFarmerशेतकरीPuneपुणे