शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 06:19 IST

ठाकरे सरकारचे गिफ्ट : कामकाजाची वेळ वाढविली

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या १८ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाच दिवसच काम करावे लागेल. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेताना रोजच्या कामकाजाची वेळ पाऊण तासाने वाढविण्याचे ठरविले.

मात्र, ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहेत, त्या कार्यालयांना व सरकारी महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाºयांसोबत गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते आणि आता निर्णयही घेतला.

शनिवार व रविवार मिळून कर्मचाºयांना १०४ दिवस सुट्टी असेल. सार्वजनिक सुट्ट्या सुमारे २० असतात.आतापर्यंत राज्य कर्मचाºयांना दुसºया व चवथ्या शनिवारी सुट्टी असायची, आता महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुट्टी असेल. या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांची एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली. आता सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. केंद्र सरकार, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा, बिहार, तमिळनाडू व पश्चिम बंगाल या राज्यांत पाच दिवसांचा आठवडा आहे. राज्यात एमएमआरडीए व एमआयडीसी कार्यालयात आधीपासूनच पाच दिवसांचा आठवडा आहे.

या निर्णयाचा फायदा कर्मचाºयांना तर होईलच, पण आठवड्यातून पाच दिवसच सरकारचे कामकाज चालणार असल्याने सरकारचा आस्थापना, तसेच वीज, पाणी, शासकीय गाड्यांचे इंधन या सर्वांवरील खर्च कमी होणार आहे.अशी असेल कामकाजाची वेळया कर्मचाºयांची मुंबईत कामकाजाची वेळ सध्या सकाळी ९.४५ ते ५.३० तर अन्यत्र सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ ही आहे. आता राज्यभर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ हीच कामकाजाची वेळ असेल. भोजनाची वेळ अर्धा तास असेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMantralayaमंत्रालयGovernmentसरकार