शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 06:19 IST

ठाकरे सरकारचे गिफ्ट : कामकाजाची वेळ वाढविली

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या १८ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाच दिवसच काम करावे लागेल. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेताना रोजच्या कामकाजाची वेळ पाऊण तासाने वाढविण्याचे ठरविले.

मात्र, ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहेत, त्या कार्यालयांना व सरकारी महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाºयांसोबत गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते आणि आता निर्णयही घेतला.

शनिवार व रविवार मिळून कर्मचाºयांना १०४ दिवस सुट्टी असेल. सार्वजनिक सुट्ट्या सुमारे २० असतात.आतापर्यंत राज्य कर्मचाºयांना दुसºया व चवथ्या शनिवारी सुट्टी असायची, आता महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुट्टी असेल. या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांची एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली. आता सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. केंद्र सरकार, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा, बिहार, तमिळनाडू व पश्चिम बंगाल या राज्यांत पाच दिवसांचा आठवडा आहे. राज्यात एमएमआरडीए व एमआयडीसी कार्यालयात आधीपासूनच पाच दिवसांचा आठवडा आहे.

या निर्णयाचा फायदा कर्मचाºयांना तर होईलच, पण आठवड्यातून पाच दिवसच सरकारचे कामकाज चालणार असल्याने सरकारचा आस्थापना, तसेच वीज, पाणी, शासकीय गाड्यांचे इंधन या सर्वांवरील खर्च कमी होणार आहे.अशी असेल कामकाजाची वेळया कर्मचाºयांची मुंबईत कामकाजाची वेळ सध्या सकाळी ९.४५ ते ५.३० तर अन्यत्र सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ ही आहे. आता राज्यभर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ हीच कामकाजाची वेळ असेल. भोजनाची वेळ अर्धा तास असेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMantralayaमंत्रालयGovernmentसरकार