शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली एसटी

By admin | Updated: August 9, 2016 22:18 IST

देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही.

ऑनलाइन लोकमत

दावडी, दि.09 -  देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही. परंतु पुण्यात आजही असे एक गाव आहे जिथे स्वातंत्र्यानंतरही कधी एसटीच पोहोचली नव्हती. मात्र आज इतक्या वर्षानंतर गावात एसटी आली आणि साऱ्या गावाने एसटीचे मनापासून उत्साहात स्वागत केले आणि आनंदोत्सव केला. आज सकाळी अकरा वाजता पहिल्यांदा गावात एसटी आली. ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी जल्लोष करुन टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. चालक व वाहक यांना महिलांनी औक्षण केले. एसटी बससमोर ग्रामस्थांनी खंडोबा देवाची तळी भरुन या एसटी बसची पुजा केली. आता दिवसभरात खेड ते खरपुडी सकाळ व संध्याकाळ एसटीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द नावाचं हे गाव. खेड सारख्या प्रगतीशील तालुक्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावरचं. गावाची लोकसंख्याही बाराशेच्या आसपास. गावात प्रती जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं एक खंडोबाचं मंदिरही. खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात. परंतु आजतागायत गावातल्या कुणालाही एसटीची सुविधा नव्हती. खरपुडी खुर्द (ता. खेड) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस आली. गावात एसटी आल्यामुळे ग्रामस्थांनी मोठया उत्साहात एसटीचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, वृध्द व विद्यार्थी अशा साऱ्यांनाच जवळच्या शिरोली फाटा किंवा नदीपालिकडील खरपुडी बुद्रुक येथे जायचे असेल तर चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट ठरलेली. ती अंगवळणीही पडलेली. खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एसटी बस व इतर वाहनांची सोय नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत राहायची. गावाला एसटी बस सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गेले कित्येक वर्षांपासून मागणी होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे माजी अध्यक्ष संदिप गाडे, मल्हारी काळे व ग्रामस्थांनी राजगुरुनगर बसस्थानक प्रमूखाकडे याबाबत पाठपुरावाही केला होता. खरपुडी, ठाकरवस्ती, काळेवस्ती, मलघेवस्ती, शिरोली फाटा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना या एसटी बसमुळे प्रवास सुलभ होणार आहे. यावेळी सरपंच अनिता गाडे, उपसरपंच बंडोपंत गाडे, संदिप गाडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सोपान गाडे, माणिकशेठ गाडे, हिराबाई काळे, गणेश गाडे, सुप्रिया गाडे, मिनाक्षी खंडागळे, सुदाम गाडे, धोडिभाऊ गाडे, कांताराम शिंदे, हिरामण मलघे, बाळासाहेब माकर, संभाजी गाडे, मुरलीधर गाडे आदी उपस्थित होते.