शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली एसटी

By admin | Updated: August 9, 2016 22:18 IST

देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही.

ऑनलाइन लोकमत

दावडी, दि.09 -  देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही. परंतु पुण्यात आजही असे एक गाव आहे जिथे स्वातंत्र्यानंतरही कधी एसटीच पोहोचली नव्हती. मात्र आज इतक्या वर्षानंतर गावात एसटी आली आणि साऱ्या गावाने एसटीचे मनापासून उत्साहात स्वागत केले आणि आनंदोत्सव केला. आज सकाळी अकरा वाजता पहिल्यांदा गावात एसटी आली. ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी जल्लोष करुन टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. चालक व वाहक यांना महिलांनी औक्षण केले. एसटी बससमोर ग्रामस्थांनी खंडोबा देवाची तळी भरुन या एसटी बसची पुजा केली. आता दिवसभरात खेड ते खरपुडी सकाळ व संध्याकाळ एसटीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द नावाचं हे गाव. खेड सारख्या प्रगतीशील तालुक्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावरचं. गावाची लोकसंख्याही बाराशेच्या आसपास. गावात प्रती जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं एक खंडोबाचं मंदिरही. खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात. परंतु आजतागायत गावातल्या कुणालाही एसटीची सुविधा नव्हती. खरपुडी खुर्द (ता. खेड) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस आली. गावात एसटी आल्यामुळे ग्रामस्थांनी मोठया उत्साहात एसटीचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, वृध्द व विद्यार्थी अशा साऱ्यांनाच जवळच्या शिरोली फाटा किंवा नदीपालिकडील खरपुडी बुद्रुक येथे जायचे असेल तर चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट ठरलेली. ती अंगवळणीही पडलेली. खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एसटी बस व इतर वाहनांची सोय नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत राहायची. गावाला एसटी बस सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गेले कित्येक वर्षांपासून मागणी होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे माजी अध्यक्ष संदिप गाडे, मल्हारी काळे व ग्रामस्थांनी राजगुरुनगर बसस्थानक प्रमूखाकडे याबाबत पाठपुरावाही केला होता. खरपुडी, ठाकरवस्ती, काळेवस्ती, मलघेवस्ती, शिरोली फाटा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना या एसटी बसमुळे प्रवास सुलभ होणार आहे. यावेळी सरपंच अनिता गाडे, उपसरपंच बंडोपंत गाडे, संदिप गाडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सोपान गाडे, माणिकशेठ गाडे, हिराबाई काळे, गणेश गाडे, सुप्रिया गाडे, मिनाक्षी खंडागळे, सुदाम गाडे, धोडिभाऊ गाडे, कांताराम शिंदे, हिरामण मलघे, बाळासाहेब माकर, संभाजी गाडे, मुरलीधर गाडे आदी उपस्थित होते.