शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अकरावीच्या पहिल्या फेरीत ५२% प्रवेशनिश्चिती नियमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 06:41 IST

६ विभागीय मंडळे; एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेशनिश्चिती. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार ५३ विद्यार्थी पात्र ठरले होते

मुंबई - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चितीची मुदत संपली असून आता प्रवेशाच्या नियमित फेरी दोनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामधील शून्य फेरी दरम्यान निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या २९ हजार ६८६ आहे, तर नियमित फेरीत १ लाख १६ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यातून आपले प्रवेश निश्चित केले. राज्यात नियमित फेरी १ साठी २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते. या फेरीत राज्यभरातून  अलॉट विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चित केले.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार५३ विद्यार्थी पात्र ठरले होतेआणि २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते.पहिल्या नियमित फेरीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २० हजार १६० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेशासाठी संमतीपत्र दाखल केले आहे तर १ लाख ६ हजार २७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले.कोट्यांतर्गत १०,३१८ प्रवेशकोट्यांतर्गत प्रवेशाची राज्यातील विद्यार्थीसंख्या१० हजार ३१८ आहे. यामधील ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.१३,२०८ जणांची प्रवेशाकडे पाठपहिल्या नियमित फेरीतील राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले असून १३ हजार २०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अलॉट होऊनही प्रवेश घेतले नाहीत. तब्बल ८१ हजार ९७५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिपोर्टिंगच केले नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMumbaiमुंबई