शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

पहिल्याच पावसाने वाघांना दिलासा, विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 5:59 PM

विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : यंदा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत वाघांना तृष्णा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, दोन दिवसांपूर्वी विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पहिल्या पावसाने वाघांना जणू दिलासा मिळाला, हे चित्र अनुभवास येत आहे.यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्चमध्ये ती तीव्र झाली होती. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. पहिल्यांदाच मार्चमध्ये नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी कसरत ठरली होती. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे महिन्यात पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. यंदा तीव्र उन्हाळा तापल्याने याचा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करताना पाणी समस्येवर मात करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांच्या सामोरे जावे लागले. परंतु, विदर्भात ७ जूनपासून मान्सून दाखल झाला. मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जंगलासह व्याघ्र प्रकल्पात हिरवळ उगवली असून, नैसर्गिक पाणवठ्यावर पाण्याचे स्त्रोत वाढले आहे. मेळघाट, ताडोबा- अंधारी, पेंच, नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पात पहिल्याच पावसाने वाघांना दिल्याचे वास्तव आहे.वणव्यापासून मुक्ततायावर्षी जंगलात आग लागण्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. वन्यजीवांचे आगीपासून नाहक नुकसान झाले. लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले. मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वणव्याची अधिक झळ जाणवली. मात्र, मान्सूनचा पहिला पाऊस पडताच वणव्याच्या घटनांपासून मुक्तता मिळाल्याचे वास्तव आहे. हल्ली सर्वत्र हिरवळ उगवली आहे. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. जंगलात हिरवळ उगवल्याने वणव्याच्या भीतीमुळे वनकर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वाघांच्या अधिवासांकडे लक्षमान्सूनचा पहिला पाऊस पडला. जंगलात हिरवळ उगवल्याने नैसर्गिक पाणवठ्यांकडे आता वाघांचा कल वाढणार आहे. त्यामुळे वाघांचे अधिवासदेखील बदलण्याची शक्यता व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी व्यक्त केली. अशावेळी वाघांची शिकार होण्याचे संकेत असल्यामुळे वाघांच्या अधिवासांकडे लक्ष देण्याविषयी वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत.वाघांचे अधिवास व त्यांच्या ये-जा करणाºया मार्गाची दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. वाघांच्या मार्गावरून ग्रामस्थ अथवा वाटसरू जाणार नाही, याबाबत काळजी घेण्यासंदर्भात अवगत केले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस वाघांना नक्कीच दिलासा देणारा ठरला आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर

टॅग्स :Tigerवाघ