शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आधी स्थगिती, आता शिंदे सरकारने पुन्हा केलं औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर, केला एक बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 12:46 IST

Maharashtra Government News: शिंदे सरकारकडून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दि. बा. पाटील विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती दिल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र आज शिंदे सरकारने औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे. तसेच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय कायदेशीर अडचणीत अडकू नये म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने काल ह्या निर्णयाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्यात आलं आहे. त्यानुसार औरंगाबादचं नामांतर हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव असं करण्यात आलं आहे.

आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये अल्पमतात असलेल्या ठाकरे सरकारने घाईगडबडीत घेतलेले काही निर्णय काही कायदेशीर अ़डचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा घेण्यात आले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याचा निर्णय झाला आहे. त्याबरोबरच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच नामांतराबाबत ठराव करावा लागतो. हा ठराव विधानमंडळ मंजूर करेल. त्यानंतर तो मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. तो आम्ही पाठवून लवकरात लवकर मंजूर करून आणू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे - औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय - उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय - नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय -  एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद