शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

आधी स्थगिती, आता शिंदे सरकारने पुन्हा केलं औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर, केला एक बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 12:46 IST

Maharashtra Government News: शिंदे सरकारकडून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दि. बा. पाटील विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती दिल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र आज शिंदे सरकारने औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे. तसेच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय कायदेशीर अडचणीत अडकू नये म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने काल ह्या निर्णयाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्यात आलं आहे. त्यानुसार औरंगाबादचं नामांतर हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव असं करण्यात आलं आहे.

आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये अल्पमतात असलेल्या ठाकरे सरकारने घाईगडबडीत घेतलेले काही निर्णय काही कायदेशीर अ़डचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा घेण्यात आले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याचा निर्णय झाला आहे. त्याबरोबरच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच नामांतराबाबत ठराव करावा लागतो. हा ठराव विधानमंडळ मंजूर करेल. त्यानंतर तो मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. तो आम्ही पाठवून लवकरात लवकर मंजूर करून आणू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे - औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय - उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय - नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय -  एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद