शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

द. मुंबईतील जुन्या इमारतींवर ‘अग्निसंकट’

By admin | Updated: May 12, 2015 02:36 IST

काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या तोकड्या यंत्रणेविषयी गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे़ अपुरे मनुष्यबळ

शेफाली परब-पंडित, मुंबईकाळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या तोकड्या यंत्रणेविषयी गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे़ अपुरे मनुष्यबळ व अद्ययावत साधनांच्या अभावामुळे जवानांची सुरक्षा धोक्यात आहे, ही बाब सातत्याने समोर येत आहे़ त्यातच अग्निरोधक यंत्रणेचा भार पेलू न शकणाऱ्या दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त हजारो धोकादायक इमारतींचा प्रश्नही या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे़दक्षिण मुंबईतील बहुतांशी जुन्या इमारती एकमेकांना खेटून उभ्या असून, तेथील मार्गही अरुंद आहेत़ काळबादेवी येथील दुर्घटनाग्रस्त गोकूळ निवासच्या मदतकार्यातही याच चिंचोळ्या मार्गाची अडचण निर्माण झाली होती़ येथील इमारती खेटून उभ्या असल्याने गोकूळ निवासला भस्मसात करणाऱ्या आगीच्या झळा आसपासच्या इमारतींनाही बसल्या. त्यामुळे त्या इमारतींच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे़ जानेवारी २०१५मध्ये नागपाडा येथील जुन्या इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला होता़ १९८० पूर्वीच्या अशा सुमारे १६ हजार उपकरप्राप्त इमारती शहरात आहेत़ ५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्र, फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टरसारखी मूलभूत यंत्रणाही नाही. त्यामुळे आग लागू नये, याची खबरदारी घेणे ऐवढेच या इमारतींमधील लाखो रहिवाशांच्या हाती आहे़