शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
3
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
4
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
5
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
6
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
7
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
8
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
9
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
10
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
11
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
12
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

द. मुंबईतील जुन्या इमारतींवर ‘अग्निसंकट’

By admin | Updated: May 12, 2015 02:36 IST

काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या तोकड्या यंत्रणेविषयी गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे़ अपुरे मनुष्यबळ

शेफाली परब-पंडित, मुंबईकाळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या तोकड्या यंत्रणेविषयी गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे़ अपुरे मनुष्यबळ व अद्ययावत साधनांच्या अभावामुळे जवानांची सुरक्षा धोक्यात आहे, ही बाब सातत्याने समोर येत आहे़ त्यातच अग्निरोधक यंत्रणेचा भार पेलू न शकणाऱ्या दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त हजारो धोकादायक इमारतींचा प्रश्नही या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे़दक्षिण मुंबईतील बहुतांशी जुन्या इमारती एकमेकांना खेटून उभ्या असून, तेथील मार्गही अरुंद आहेत़ काळबादेवी येथील दुर्घटनाग्रस्त गोकूळ निवासच्या मदतकार्यातही याच चिंचोळ्या मार्गाची अडचण निर्माण झाली होती़ येथील इमारती खेटून उभ्या असल्याने गोकूळ निवासला भस्मसात करणाऱ्या आगीच्या झळा आसपासच्या इमारतींनाही बसल्या. त्यामुळे त्या इमारतींच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे़ जानेवारी २०१५मध्ये नागपाडा येथील जुन्या इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला होता़ १९८० पूर्वीच्या अशा सुमारे १६ हजार उपकरप्राप्त इमारती शहरात आहेत़ ५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्र, फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टरसारखी मूलभूत यंत्रणाही नाही. त्यामुळे आग लागू नये, याची खबरदारी घेणे ऐवढेच या इमारतींमधील लाखो रहिवाशांच्या हाती आहे़