शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:52 IST

पहाटे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट, पंढरपूर आणि बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागवण्यात आल्या. आगीचे रौद्ररूप पाहता पोलिसांनी परिसरात नाकाबंंदी केली. मदतीसाठी ‘सीआरपीएफ’चे पथकही आले. त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत आग आटोक्यात आणण्याच्या कामात मदत केली. 

सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंटर टेक्सटाइल या टाॅवेल निर्मिती कारखान्याला रविवारी पहाटे ३ वाजता लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात कारखानदाराच्या कुटुंबातील चार जणांसह एकाच कुटुंबातील चार कामगारांचा समावेश आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. १५ तासांनंतरही आग आटोक्यात आणण्यासाठी ६० हून अधिक बंबांच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

पहाटे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट, पंढरपूर आणि बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागवण्यात आल्या. आगीचे रौद्ररूप पाहता पोलिसांनी परिसरात नाकाबंंदी केली. मदतीसाठी ‘सीआरपीएफ’चे पथकही आले. त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत आग आटोक्यात आणण्याच्या कामात मदत केली. 

दाेन कुटुंबे भस्मसात - कारखान्याचे मालक उस्मान हाशम मन्सुरी (८७), त्यांचा नातू अनस हनिफ मन्सुरी (२४), नात सून शिफा अनस मन्सुरी (२४) व अनसचा मुलगा युसूफ मन्सुरी (१ वर्ष) हे चाैघे मालकाच्या कुटुंबातील आहेत. 

कामगार मेहताब सय्यद बागवान (५१), आशाबानो मेहताब बागवान (४५), सलमान मेहताब बागवान (२६),  हिना वसीम शेख (२४) हे चार जणदेखील एकाच कुटुंबातील आहेत. 

मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख :  मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणांचा गुदमरून मृत्यू -हैदराबाद : येथील ऐतिहासिक चारमिनार लगतच्या गुलजार हाउसमधील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून १७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे.रविवारी सकाळी बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. मात्र, काही क्षणात या आगीने संपूर्ण इमारतीला कवेत घेतले. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एकमेव अरुंद मार्ग होता. मात्र, भीषण आगीमुळे बाहेर पडता न आल्याने बहुतांश जणांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. सकाळी सव्वा सहा वाजता आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन विभागाला माहिती मिळाली. या दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन विभागाच्या बंबांनी काही वेळात या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. या इमारतीत २१ लोक होते. 

कारणांची चाैकशी सुरू -१७ जणांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

तेलंगणाचे मंत्री पन्नम प्रभाकर यांनी सांगितले की, इमारतीत राहणारे बहुतेक लोक मरण पावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पीडितांना सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार असल्याचे एक्सद्वारे जाहीर केले. 

टॅग्स :fireआगDeathमृत्यू