शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:37 IST

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आम्हीच सोडविणार

सातारा : ‘शासनाकडून सवलत, मोफत योजना सुरू आहेत. राज्याचा अर्थसंकल्पही जाहीर होणार आहे, पण मागील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने राज्यात आर्थिक गैरशिस्त केल्यानेच सध्या काही प्रश्न निर्माण झाले आहेत,’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भंडारी यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली.भाजप प्रदेश उपाध्यक्ष भंडारी म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा आणि मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. तसेच शेतकरी, गरीब, महिला आणि युवा या विकसित भारताच्या चार प्रमुख स्तंभांना सक्षम करण्याचे कामही अर्थसंकल्पाने केले आहे. या अर्थसंकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत.दरम्यान, यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांनाही भंडारी यांनी उत्तरे दिली, तर कंत्राटदार आणि अनेक शासकीय योजनांची बिले थकली आहेत. लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम आहे का ? असा प्रश्नही त्यांना करण्यात आला. यावर भंडारी यांनी मागील ७५ वर्षांत राज्यातील ठेकेदार रस्त्यावर कधी आले नव्हते, पण ठाकरे सरकारने आर्थिक गैरशिस्त केल्याने प्रश्न निर्माण झालेत, असे सांगितले.तसेच राज्यातील बांबू लागवडीच्या प्रश्नावर त्यांनी बांबूपासून इथेनाॅल निर्मिती होणार आहे. यामुळे कितीही बांबू लावला तरी नुकसान होणार नाही. तसेच प्रक्रिया उद्योग तयार केल्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर कोयनेची संकलन यादी भाजपने केली. या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आम्हीच सोडविणार, असेही त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर दिले.भाजप पदाधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन..पत्रकार परिषदेपूर्वी भाजपची सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहातच झाली. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष भंडारी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प उकल करून सोप्या भाषेत सांगितला. तसेच पदाधिकाऱ्यांनाही लोकांत जाऊन त्यांना अर्थसंकल्पाचे मुद्दे समजून सांगावेत, अशी सूचनाही केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकार