शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता लॉकडाऊननंतर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 19:36 IST

कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेणे अत्यंत जिकिरीचे ठरणार

ठळक मुद्देराज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्याकरिता कृती आराखडामहाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोरोनाबाधित असल्याने रेड झोन मध्ये

पुणे: नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विविध परीक्षा संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षात प्रवेश देण्याचा व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊननंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोरोनाबाधित असल्याने रेड झोन मध्ये आहेत. तसेच राज्यातील कृषी महाविद्यालयांची बहुतेक वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने विलगीकरणाकरिता अधिग्रहीत केलेली आहेत. ही वसतिगृहे महाविद्यालय प्रशासनाकडे केव्हा हस्तांतरीत केले जातील, याबाबत कल्पना नाही अशा परिस्थितीमध्ये कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्याकरिता संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्र निहाय परीक्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार काही विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. तर काही विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन संपल्यानंतर घेतली जाणार आहे.----------------परीक्षेच्या नियोजनाचा कृति आराखडा पुढीलप्रमाणे :* दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या अंतर्गत गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश * दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेतली जाणार* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या ५० आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश * तीन वर्ष कृषी तंत्रनिकेतन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार* प्रथम, द्वितीय ,तृतीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण चालू सत्रातील अंतर्गत गुणांच्या आणि मागील सत्रातील निकालाच्या सरासरीच्या आधारे गुणदान देऊन पुढील सत्रात प्रवेश* पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वषार्तील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ