शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता लॉकडाऊननंतर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 19:36 IST

कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेणे अत्यंत जिकिरीचे ठरणार

ठळक मुद्देराज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्याकरिता कृती आराखडामहाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोरोनाबाधित असल्याने रेड झोन मध्ये

पुणे: नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विविध परीक्षा संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षात प्रवेश देण्याचा व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊननंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोरोनाबाधित असल्याने रेड झोन मध्ये आहेत. तसेच राज्यातील कृषी महाविद्यालयांची बहुतेक वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने विलगीकरणाकरिता अधिग्रहीत केलेली आहेत. ही वसतिगृहे महाविद्यालय प्रशासनाकडे केव्हा हस्तांतरीत केले जातील, याबाबत कल्पना नाही अशा परिस्थितीमध्ये कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्याकरिता संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्र निहाय परीक्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार काही विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. तर काही विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन संपल्यानंतर घेतली जाणार आहे.----------------परीक्षेच्या नियोजनाचा कृति आराखडा पुढीलप्रमाणे :* दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या अंतर्गत गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश * दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेतली जाणार* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या ५० आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश * तीन वर्ष कृषी तंत्रनिकेतन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार* प्रथम, द्वितीय ,तृतीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण चालू सत्रातील अंतर्गत गुणांच्या आणि मागील सत्रातील निकालाच्या सरासरीच्या आधारे गुणदान देऊन पुढील सत्रात प्रवेश* पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वषार्तील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ