शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अजित पवारांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा आमच्या काही हितचिंतकांकडून; सुनिल तटकरेंचा कोणावर निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:17 IST

आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

मुंबई : लेखी आणि तोंडी परीक्षेत २५-२५ मार्क असतात तसे मैदानी परीक्षेतही ५० मार्क असतात त्यामुळे आमदारांची लोकशाही मार्गाने निवडून आलेली स्टेंथ म्हणजे मैदानी परीक्षा असते त्यामुळे निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी 'निवडणूक आयोगाचा पेपर फुटला' या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.  

आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे तो पेपर फुटल्यामुळे प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी फुटलेल्या पेपरवर प्रतिक्रिया दिली आहे असे ऐकण्यात आले. हा पेपर फुटायचे कारणच नाही. निवडणूक आयोगाची जी काही परिक्षा आहे त्यात सरळ सांगायचे झाले तर लेखी परीक्षेत २५ तर तोंडी परीक्षेला २५ मार्क आहेत आणि मैदानी परीक्षेला ५० मार्क आहेत असे प्रत्येक परीक्षेचं एक विश्लेषण असते, असे सुनिल तटकरे म्हणाले.

सरकारी भरती होत असतात त्यावेळीही लेखी, तोंडी, आणि मैदानीला मार्क असतात. त्यामुळे त्यामध्ये कुठल्या विषयाला मार्क ठरलेले आहेत. त्या मार्काचा अभ्यास करत कदाचित प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे व माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ता म्हणत असेल त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब ठरेल असे सांगतानाच निवडणूक आयोगाची स्वायत्तता, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेला निकाल याची कायदेशीर, ज्येष्ठ विधीज्ञासोबत चर्चा करून सामुदायिकरित्या लोकशाही मार्गाने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. 

याचबरोबर, दादांच्या (अजित पवार) नाराजीच्या कल्पोकल्पित कथा किंवा त्यासंदर्भातील भाष्य आमच्यावर प्रेम करणारे जे काही हितचिंतक आहेत, ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठलीही नाराजी अजित पवार यांच्या मनात किंवा मंत्र्यांच्या, आमदारांच्या मनात आजपर्यंत नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. त्या विचारांशी समरस होऊनच काम करण्याची आमची सर्वांची तयारी आहे, असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवारांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा काही आमच्या हितचिंतकांकडून केल्या जात आहेत, असे म्हणत सुनिल तटकरे यांनी नेमका कुणावर निशाणा साधला. याबाबत चर्चा सुरु आहे.  

 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस