शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राममंदिरावरून दंगलींची भीती; जिल्ह्याजिल्ह्यांत ‘शांतता मार्च’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:52 IST

प्रकाश आंबेडकर; वंचित बहुजन आघाडी सलोखा वाढविणार

औरंगाबाद : सध्या हिंदू-मुस्लिम तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा न करता राममंदिर बांधण्याची तारीख निश्चित करणे असंवैधानिक आहे. त्यातून पुन्हा एकदा जातीय दंगली घडण्याची शक्यता अमेरिकेच्या रॉ एजन्सीनेही व्यक्त केली आहे. किमान महाराष्ट्रात तरी शांतता राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यांत ‘शांतता मार्च’ काढले जातील, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.ते म्हणाले, दोन महिन्यांपासून रा. स्व. संघ व मोहन भागवत यांनी कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत राममंदिर बांधण्याचा धोशा लावला आहे. न्यायालयाचा निकाल येवो न येवो आम्ही राममंदिराचे बांधकाम सुरू करणार, अशी घोषणा झाली आहे. २१ फेब्रुवारी ही तारीखही जाहीर झाली आहे. मग साडेचार वर्षे हे सरकार काय करीत होते? कुंभकर्णी झोपेत होते. अलीकडेच झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकांनंतर केंद्रातले सरकार पुन्हा येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणून धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाचा निकाल लवकर यावा, ही अपेक्षा आहे; परंतु रा. स्व. संघासारख्या संघटना राष्ट्रपतींच्या आधिपत्याखालील प्रशासन मानत नाहीत. त्यांची समांतर प्रशासन व्यवस्था असून, ती संविधानाला व देशाला घातक आहे. म्हणूनच निकाल येईपर्यंत सर्वांनी शांतता ठेवायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले....तर ‘ते’ यापुढेही ठोकले जातीलरामदास आठवलेंबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, त्यांनी नीतिमत्ता जोपासावी; अन्यथा ते यापुढेही ठोकले जातील. १० फेब्रुवारीला रिपब्लिकन पक्षाचा जबिंदा लॉन्सवर महामेळावा आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे. माझ्यात बाबासाहेब पाहण्यापेक्षा, मला प्रकाश आंबेडकर म्हणूनच जगू द्या, असे ते म्हणाले.दंगे होऊ देणार नाही : न्यायालयाचा निकाल येईपर्यंतही ही मंडळी थांबायला तयार नाही, हे दुर्दैव असून, परिस्थिती बिघडू नये, याची काळजी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे. आमच्या जिल्ह्यात शांतता राहील. दंगल होऊ देणार नाही, याची ग्वाही आम्ही देणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९