शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

एक हजार गावांत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: September 11, 2015 03:09 IST

मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये

औरंगाबाद : मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये मिळून ८.५ टक्के इतकाच पाणीसाठी उपलब्ध आहे.जायकवाडीसारख्या मोठ्या धरणात केवळ ४.१३ टक्के तर, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणात ७.७ टक्के एवढेच पाणी आहे. अनेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा जून अािण जुलै महिन्यांत संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने आठही जिल्ह्यांत जुलै महिन्यापासूनच पाणीटंचाई आहे. सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार दिवस बरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण यामुळे पाण्याचे संकट मात्र टळलेले नाही. औरंगाबाद शहरातही चार दिवसांआड पाणी येत आहे. जिल्ह्यातील १२२ गावांत तीव्र पाणीटंचाई असून, १५३ टँकर चालू आहेत. अनेक प्रकल्प कोरडेठाकचार दिवसांपासून काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असला तरी अनेक पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा (बीड) निम्न तेरणा (उस्मानाबाद) या चार धरणांत सद्य:स्थितीला उपयुक्त जलसाठा शून्य असून, सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या बंधाऱ्यातही शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. विष्णुपुरी धरणात २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.बीड जिल्ह्यात भीषण स्थितीअवर्षणप्रवण असलेल्या बीड जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याची मोठी कमतरता होती. यंदा मात्र स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ५९२ टँकर चालू करण्यात आले आहेत. तरीही अनेक गावे अद्यापही तहानलेली आहेत.