शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार गावांत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: September 11, 2015 03:09 IST

मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये

औरंगाबाद : मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये मिळून ८.५ टक्के इतकाच पाणीसाठी उपलब्ध आहे.जायकवाडीसारख्या मोठ्या धरणात केवळ ४.१३ टक्के तर, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणात ७.७ टक्के एवढेच पाणी आहे. अनेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा जून अािण जुलै महिन्यांत संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने आठही जिल्ह्यांत जुलै महिन्यापासूनच पाणीटंचाई आहे. सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार दिवस बरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण यामुळे पाण्याचे संकट मात्र टळलेले नाही. औरंगाबाद शहरातही चार दिवसांआड पाणी येत आहे. जिल्ह्यातील १२२ गावांत तीव्र पाणीटंचाई असून, १५३ टँकर चालू आहेत. अनेक प्रकल्प कोरडेठाकचार दिवसांपासून काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असला तरी अनेक पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा (बीड) निम्न तेरणा (उस्मानाबाद) या चार धरणांत सद्य:स्थितीला उपयुक्त जलसाठा शून्य असून, सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या बंधाऱ्यातही शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. विष्णुपुरी धरणात २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.बीड जिल्ह्यात भीषण स्थितीअवर्षणप्रवण असलेल्या बीड जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याची मोठी कमतरता होती. यंदा मात्र स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ५९२ टँकर चालू करण्यात आले आहेत. तरीही अनेक गावे अद्यापही तहानलेली आहेत.