शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

यवतमाळमधील शेतकरी मृत्यूस कृषी अधिकारी जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 1:21 AM

कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे.

- योगेश बिडवई।मुंबई : कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे. कृषी मंत्रालयाने कृषी अधीक्षक व जिल्हा परिषदेचे कृषी विकास व इतर संबंधित अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.बेजबाबदार अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न कृषी विभागाने विचारला आहे. कीटकनाशके हाताळताना विषबाधा झाल्यास त्याची माहिती पाठविण्याची जबाबदारी मुख्य पीक संरक्षण अधिकाºयाकडे असते. कीटकनाशके हाताळण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे आवश्यक होते, तसे घडले नाही.अधिकाºयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली नाही. प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या नाहीत. शेतकºयांच्या मृत्यूची गंभीर घटनाही निष्काळजीपणाने दुर्लक्षित करण्यात आली. विषबाधेनंतर शेतकरी मेळावे, प्रशिक्षण घेण्यात आले नाहीत,असा ठपकाही कृषी विभागाने ठेवला आहे.कृषी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे ४५० पेक्षा अधिक शेतकºयांना विषबाधा झाल्यानंतरही त्याची योग्य माहिती विभागाला पात्र झाली नाही. त्याचा कोणताही अहवाल न येणे हे गंभीर असल्याचे उपसचिव सु. सं. धपाटे यांनी नोटीशीत म्हटले आहे.यांच्यावर होणार कारवाई?क्रॉपसॅकचे स्काऊटस्, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी गावाला भेट न दिल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याचे नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी