शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मार्ग होणार मोकळा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 11:22 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते.

मुंबई - भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्याऐवजी विरोधीपक्ष म्हणून सभागृहात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. राज्यातील या घडामोडींमुळे बळीराजा आनंदीत असून आता बळीराजाला सरसकट कर्जमाफीचे वेध लागले आहेत. 

भारतीय जनता पक्ष वगळता विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. यात काँग्रेस-राष्ट्रवादीने सरसकट कर्जमाफीचे आश्वसन दिले होते. तर शिवसेनेने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होते. त्यामुळे शेतकऱ्यांना या तिन्ही पक्षांकडून चांगल्याच आपेक्षा आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने राज्यात शेतकरी कर्जमाफी केली होती. परंतु, अनेक निकष आणि अटी यामुळे प्रत्येक गावातील बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आशा आहे. आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतला आहे. 

दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. राष्ट्रवादी-काँग्रेसकडून तर पहिल्या कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आता हे आश्वासन पूर्ण करण्यात उभय पक्ष किती वेळ लावणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.