शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मार्ग होणार मोकळा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 11:22 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते.

मुंबई - भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्याऐवजी विरोधीपक्ष म्हणून सभागृहात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. राज्यातील या घडामोडींमुळे बळीराजा आनंदीत असून आता बळीराजाला सरसकट कर्जमाफीचे वेध लागले आहेत. 

भारतीय जनता पक्ष वगळता विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. यात काँग्रेस-राष्ट्रवादीने सरसकट कर्जमाफीचे आश्वसन दिले होते. तर शिवसेनेने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होते. त्यामुळे शेतकऱ्यांना या तिन्ही पक्षांकडून चांगल्याच आपेक्षा आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने राज्यात शेतकरी कर्जमाफी केली होती. परंतु, अनेक निकष आणि अटी यामुळे प्रत्येक गावातील बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आशा आहे. आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतला आहे. 

दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. राष्ट्रवादी-काँग्रेसकडून तर पहिल्या कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आता हे आश्वासन पूर्ण करण्यात उभय पक्ष किती वेळ लावणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.