शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 06:03 IST

देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते मग, या शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, या देशात प्रथमच शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून कर लागू करण्यात आला आहे, तो काढून शेतकरी करमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी दिले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती येथे सभेत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांसाठी सदैव दारे उघडी ठेवणार

- शेतकऱ्यांच्या समस्यांवर चार मात्रा सांगत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना उत्तर दिले. 

- याशिवाय देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे सांगितले.

अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जातेय

या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात महागाई, बेरोजगारी, भागीदारी, धर्म आणि शेतकरी अशा अनेकांच्या समस्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष केले असून, राम मंदिर किंवा अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जाते, असे सांगून देशातील धनाढ्य उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देऊन देखील तशी कृती केली नाही, याचा पुनरुच्चार करून त्यांनी शेतकरी समस्याग्रस्त असून, त्यांच्या समस्यांवर उपचार म्हणून केवळ एक मात्रा चालणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, देशात जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर प्रथमच लागू करण्यात आलेला कर मागे घेण्यात येईल. हमीभाव देणे कायद्याने शक्य नाही, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, या आयोगांच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देण्यात येईल, असे ते म्हणाले.   

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीNashikनाशिकcongressकाँग्रेस