शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

शेतकऱ्यांचा योद्धा प्रा. शरद पाटील

By admin | Updated: November 20, 2014 01:09 IST

शरद जोशींचे घराणे, जात, पैसा, पार्श्वभूमी या सगळ्या बाबी संपूर्णपणे प्रतिकूल असताना त्यांनी शेतकऱ्यांची अभूतपूर्व एकी घडवून आणली. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्वित्झर्लंडसारख्या देशातली एषोरामी

शरद जोशींचे घराणे, जात, पैसा, पार्श्वभूमी या सगळ्या बाबी संपूर्णपणे प्रतिकूल असताना त्यांनी शेतकऱ्यांची अभूतपूर्व एकी घडवून आणली. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्वित्झर्लंडसारख्या देशातली एषोरामी नोकरी सोडून ते शेतकऱ्यांची संघटना बांधायला भारतात आले. तेव्हा या बामणाच्या पोराला शेतीतले काय कळते म्हणून त्यांची हेटाळणी झाली. सुरुवातीला हा चक्रम माणूस आपल्या गावात आला असे म्हणून दूर पळणारे शेतकरी हळूहळू त्यांच्या जवळ यायला लागले. शेतीचा व्यवसाय तोट्यात का आहे? याचे त्यांनी केलेले विश्लेषण त्यांच्या मनाला भिडले. पाहता-पाहता शेतकरी संघटना उभी झाली आणि या संघटनेने शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळविले. नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी १९८० मध्ये एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांची युनोमधील नोकरी, त्यांची विद्वत्ता, शेतकऱ्यांविषयीची कळकळ, सहज, सोप्या भाषेत संवाद साधण्याची हातोटी या गुणांमुळे त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाले. शेतीच्या प्रश्नांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेली संघटनेची विचारधारा एक नवीन दिशा देणारी ठरली. स्वत: शेतीवर अवलंबून नसूनही आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा माणूस फार मोठा त्याग करून भारतात आला, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना होती. लोक शरद जोशी आणि संघटनेवर फिदा झाले. कांदा आंदोलनानंतर संघटना इतकी बलशाली झाली की, तिच्या नावाने सत्ताधाऱ्यांना धडकी भरत होती. राजकारणात मुरलेल्या सत्ताधाऱ्यांना या संघटनेने सळो की पळो करून सोडले. अनेक शेतकऱ्यांनी शरद जोशींचे छायाचित्र देव्हाऱ्यात ठेवून त्यांची पूजाच मांडली, हे मी स्वत: अनुभवले आहे. त्या काळात देशातील शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहात होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर ते दिवस अक्षरश: मंतरलेले होते. शरद जोशींच्या सभांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. असंख्य प्रामाणिक आणि नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची फैज त्यांच्या मागे उभी झाली. संघटनेच्या सभांना तीन-चार लाखांची गर्दी साधारण बाब झाली. संघटनेचा बिल्ला छातीवर लावलेला कार्यकर्ता एखाद्या विजयी विराच्या तोऱ्यात वावरायचा. सर्वसामान्य शेतकऱ्यांनासुद्धा संघटनेने जो आत्मविश्वास आणि आत्मस्नमान दिला त्याला शेतकरी चळवळीच्या इतिहासात तोड नाही. राजकारणी लोकांना ही नवीनच डोकेदुखी सुरू झाली. हा झंझावात कसा आवरावा, हे त्यांना कळेना. जातीयवादाचे त्यांचे हुकुमी शस्त्र बोथट झाले. कारण हे बामनाचे पोर शेतकऱ्यांना आपल्या रक्ताच्या पुढाऱ्यांपेक्षाही जास्त जवळचे वाटायला लागले होते. शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं. शेतीच्या शोषणाचं मूळ सरकारी धोरणात आहे हा अर्थशास्त्रीय विचार त्यांनी इतक्या प्रभावीपणे आणि इतक्या सोप्या भाषेत मांडला की, संघटनेचे अडाणी कार्यकर्तेसुद्धा मोठमोठ्या विद्वानांशी विवाद घालून त्यांना निरुत्तर करायला शिकले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतमालाच्या भावाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय निर्विवादपणे त्यांचेच आहे. त्यांच्या एका हाकेवर लाखो शेतकरी जमायचे कारण ते खरोखरीच शेतकऱ्यांचे पंचप्राण होते. अनेक लोक समजतात त्याप्रमाणे शेतमालाला भाव हा काही शरद जोशींचा एककलमी कार्यक्रम नव्हता. ग्रामीण जीवनात समग्र क्रांती आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. शेतीत कष्ट करणाऱ्या स्त्रिया असोत वा शोतमजूर सगळ्याच कष्टकऱ्यांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचा लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता. शेतकऱ्यांनी शेतीतला वाटा आपल्या पत्नीच्या नावे करून द्यावा या त्यांच्या आग्रहाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शेतमालाला भाव मिळूनही शेतमजुरांची मजुरी वाढली नाही तर मी स्वत: शेतकऱ्यांच्या विरोधात चळवळ उभी करीन. (लेखक शेतकरी संघटनेच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)मारवाडी फाऊंडेशनचा यंदाचा समाज प्रबोधन पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना देण्यात येत आहे. वयाच्या पंचविशीत असलेल्या युवा पिढीला कदाचित या शेतकरी योद्ध्याची पुरेशी ओळख नसावी. पण ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली असेल त्यांना शरद जोशींनी ८०च्या दशकात एकहाती निर्माण केलेल्या शेतकरी संघटनेच्या झंजावाताचा विसर पडणे शक्य नाही. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरद जोशी यांना स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शरद जोशी यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध.