शेतकऱ्याची सप्तश्रुंग गडावर आत्महत्या
By Admin | Updated: June 3, 2016 22:42 IST2016-06-03T22:39:13+5:302016-06-03T22:42:00+5:30
शेतजमीनीच्या वादावरुन आणि वारंवार होणाऱ्या शिवीगाळ, दमदाटीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या वासुळ येथील एका शेतकऱ्याने सप्तश्रुंग गडावरील नारळे जंगल परिसरात झाडाला गळफास

शेतकऱ्याची सप्तश्रुंग गडावर आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
कळवण, दि. 3 - शेतजमीनीच्या वादावरुन आणि वारंवार होणाऱ्या शिवीगाळ, दमदाटीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या वासुळ येथील एका शेतकऱ्याने सप्तश्रुंग गडावरील नारळे जंगल परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली. संजय रामचंद्र आहीरे रावाखारी( ह. मु. वासुळ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी गुन्हा दाखल होताच ७ आरोपींना पकडण्यात यश मिळविले.