शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 20:34 IST

जयंत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले आक्रमक

Jayant Patil vs BJP Govt: देशात आणि राज्यात सध्या शेतकरी विरोधी सरकार अस्तित्वात आहे. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले जात आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे बळीराजाचं राज्य पुन्हा आणण्याकरिता शरद पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील आणि न्याय देणारं सरकार सत्तेत येईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. आम आदमी पार्टीच्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपिन चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, "शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवण्याकरिता शेतकऱ्यांच्या संघटनेची ताकद एकत्रित आली पाहिजे  त्यानंतर शेतकरी विरोधी सरकारला आपण धक्का लावू शकतो. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आणता येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या वर्षभरात अनेक नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांनी तोंड दिले आहे. सरकारने घोषणा करायची मात्र मदत करायची नाही असे धोरण सरकारचे आहे. विलंबाने करण्यात आलेल्या मदतीला काही अर्थ राहत नाही. आजही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आहे तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर  पुन्हा पेरणीचे संकट देखील आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत."

"एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या होत असताना शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना पंतप्रधान यांना यवतमाळ मध्ये घेऊन आले होते. यावेळी त्या शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांचे केंद्राकडून पॅकेज मंजूर करून देण्याचे काम पवार साहेबांनी केले होते. शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांकरिता विविध योजना आत्महत्याग्रस्त भागात राबवल्या होत्या," याची आठवण जयंत पाटील यांनी सध्याच्या सरकारला करून दिली.

"देशात सध्या काय चाललं आहे सर्वांनाच माहित आहे. शेतकरी आंदोलन करत आहे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे. मणिपूर मधील घटने वर चर्चा करण्यात यावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावे याकरता विरोधकांकडून मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील जनता अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. देशातील महिला सुरक्षित नाहीत. या मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी अधिक ताकतीने शरद पवार यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा विकास हा केवळ 'जाणता राजा' शरद पवार यांच्या नेतृत्वातच होऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याची क्षमता केवळ शरद पवार यांच्यातच आहे," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलFarmerशेतकरीBJPभाजपाSharad Pawarशरद पवार