शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले

By admin | Updated: May 2, 2017 02:46 IST

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात

ठाणे : शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात आला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा पहिला प्रयोग सुरू झाला आणि त्याचा शुभारंभ होण्याच्या आधीच काही शेतकऱ्यांचे २०० किलो मुग आणि हरडा, शेवया, रवा असे एक क्विंटल धान्य काही तासातच संपल्याने शेतकरी हरखून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पसरला आणि इतर शेतकऱ्यांनाही हुरूप आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोचविण्याचा प्रयोग विविध ठिकाणी राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या गावदेवी मैदानात धान्य महोत्सव सुरू झाला. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली आदींसह इतर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने सहभागी झाला आहे. मालाला चांगला भाव मिळेल की नाही, याबाबत त्याच्या मनात शंका होती. परंतु नाम फाऊंडेशन आणि संस्कार प्रतिष्ठानची साथ त्यांना लाभल्याने पहिल्याच दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेले पाहावयास मिळाले. हिंगोलीवरुन प्रकाश हिंगोले आणि उत्तम भोईर यांनी आणलेले २०० किलो मूग हा महोत्सव सुरु होण्यापूर्वीच स्टॉल मांडत असतांनाच संपल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुसरीकडे शारदा आणि त्यांचे पती अण्णासाहेब जगताप यांनी हुरडा, भरडा, शेवाळ्या रवा, असा जव जवळ दीड क्विंटलचा माल येथे विकण्यासाठी आणला होता. त्यातील एक क्विंटल मालदेखील महोत्सव सुरु होण्यापूर्वीच हातोहात संपल्याने त्यांनाही आनंद झाला. शेतकऱ्याला या महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या कामाचा आणि श्रमाचा मोबदला मिळत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या महोत्सवाच्या माध्यमातून गहू, जवस, मूग, ज्वारी, हळद, तूर, तुरडाळ आदींसह इतर धान्य विकण्यासाठी ठेवण्यात आले आहे. हे धान्य सेंद्रीय पध्दतीने पिकविण्यात आल्याने मागणी वाढत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)आम्ही पिकवणार, आम्हीच विकणारआमच्या शेतातून पिकविलेला माल आणि त्यालाही चांगली किमंत आम्हाला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडे हात पसरविण्याची आता आम्हाला गरज राहिलेली नाही. आम्हीच पिकविणार आणि आम्हीच विकणार त्यामुळेच दिड क्विंटल मालापैकी तब्बल १ क्विटंल माल अवघ्या काही तासात विकला गेल्याचे समाधान आहे.- शारदा आणि अण्णासाहेब जगताप, हिंगोलीपूर्वी व्यापाऱ्यांच्या हाती आपला माल दिल्यावर त्याला हव्या त्या किंमतीत तो माल खरेदी करीत होता. परंतु बाजारात मात्र दुप्पट भावाने विकत होता. यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. परंतु आता आमचा माल आम्हीच विकत असल्याने आणि पहिल्यापेक्षा १५ ते २० टक्के अधिक मोबदला मिळत असल्याने त्याचा आनंद आहे. - रायचुरे कदम, बीडव्यापाऱ्यांना माल विकत असतांना त्याठिकाणी दलालांना देखील मलिदा मिळत होता. त्यात व्यापाऱ्यांपर्यंत माल पोहचविण्याचा जबाबदारी आम्हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर होती. परंतु फायदा मात्र व्यापारी उचलत होता. परंतु आता खऱ्या अर्थाने आम्हाला चांगला भाव मिळत असल्याचे समाधान मिळत आहे.- उत्तरेश्वर नखाते व सतीश निगडे, बीडसेंद्रीय पध्दतीने आम्ही धान्य पिकवत असल्याने आणि थेट ग्राहकापर्यंत जाण्याचा मान आम्हाला आता मिळत असल्याने आमच्याबरोबर ग्राहकांना देखील कमी भावात उच्च दर्जाचा माल मिळत आहे. - देविदास खोटे, बोरखडे, बीडशेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या मालाचा चांगला मोबदला मिळावा म्हणून हे पाऊल नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज नसून त्यांचा माल थेट ग्राहकाच्या हाती पडत असून तो ही मार्केटपेक्षा कमी किमतीत मिळत आहे. - राजाभाऊ शेळके, नाम फाऊंडेशनचे पदाधिकारीकोकण आणि मराठवाड्याचा हा एक सुंदर मिलाप आहे, एकीकडे कोकणातील आंबा आणि दुसरीकडे विदर्भातील धान्य एकाच छताखाली ग्राहकांना मिळण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांना देखील पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. - आमदार संजय केळकर, आयोजक