शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:56 IST

अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

अकोला : यंदा पावसाच्या तडाख्यात  राज्यात पिकांसह जमिनीचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका, असे सांगत नुकसानाचे पंचनामे करून  लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी येथे दिली. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने कृषी विद्यापीठात आयोजित  तीनदिवसीय खरीप शिवार फेरी व चर्चासत्राच्या  उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवले असून, आतापर्यंत ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झाल्याचे सांगत, राज्य शासन  शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून,  अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

सहलीवर गेलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांवर  कारवाई

अतिवृष्टीने आर्णीसह महागाव तालुक्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात काही तलाठी तसेच मंडळ अधिकारी सहलीवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली.  अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नजरा मदतीसाठी शासनाकडे लागल्या आहेत. या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. अशा काळात कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडायला नको होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरी