शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:56 IST

अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

अकोला : यंदा पावसाच्या तडाख्यात  राज्यात पिकांसह जमिनीचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका, असे सांगत नुकसानाचे पंचनामे करून  लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी येथे दिली. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने कृषी विद्यापीठात आयोजित  तीनदिवसीय खरीप शिवार फेरी व चर्चासत्राच्या  उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवले असून, आतापर्यंत ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झाल्याचे सांगत, राज्य शासन  शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून,  अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

सहलीवर गेलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांवर  कारवाई

अतिवृष्टीने आर्णीसह महागाव तालुक्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात काही तलाठी तसेच मंडळ अधिकारी सहलीवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली.  अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नजरा मदतीसाठी शासनाकडे लागल्या आहेत. या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. अशा काळात कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडायला नको होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरी