शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकऱ्यांनो, कापूस विकायची घाई नको; गरजेपुरता विकून दिवाळी करा साजरी, तज्ज्ञांचे आवाहन

By सुनील चरपे | Updated: October 15, 2022 09:09 IST

शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता, गरजेपुरता कापूस विकून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन बाजारतज्ज्ञ व अभ्यासकांनी केले आहे.

सुनील चरपे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील हंगामात १४ हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेलेले कापसाचे दर सध्या ७,५०० ते ८,००० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. जागतिक व देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरातील ही घसरण सुरूच आहे. बाजारातील कापसाच्या आवक आणि दराचे खरे चित्र जानेवारीमध्ये स्पष्ट हाेईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता, गरजेपुरता कापूस विकून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन बाजारतज्ज्ञ व अभ्यासकांनी केले आहे.

देशातील मिल व जिनिंग, प्रेसिंग मालकांच्या संघटनांकडून बाजारातील कापसाच्या मागील व चालू हंगामांतील याच काळातील आवक यावर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जाताे. ते आकडे जानेवारीमध्ये येतील. कापसाची आवक किती आहे, यावर हा अंदाज वर्तवलेला असताे. आवक कमी झाल्यास कापसाचे दर वधारतील किंवा आवक वाढल्यास दर कमी हाेतील अथवा स्थिर राहतील, असे काॅटन ॲडव्हायझरी बाेर्डचे माजी सदस्य तथा जिनर विजय निवल व इतर जिनिंग मालकांनी सांगितले. दरातील चढ-उतार जागतिक बाजारावर अवलंबून असेल, असे शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया म्हणाले.

सूतगिरण्या बंद, कापड गिरण्या अर्ध्यावर

देशभरातील ५५ ते ६० टक्के सूतगिरण्या सध्या पूर्णतः बंद आहेत. माेठ्या कापड गिरण्यांमध्ये एक ते दाेन शिफ्टमध्ये काम सुरू असून, ६० टक्के छाेट्या गिरण्या बंद आहेत. त्यामुळे कापसाची मागणी घटली आहे. या गिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर कापसाची मागणी वाढेल. 

आयात शुल्क रद्द, निर्यातीला सबसिडी हवी

- केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ ऑक्टाेबरपर्यंत पूर्णपणे रद्द केले आहे. त्यामुळे थाेडा कापूस आयात करून देशांतर्गत भाव पाडण्याचे काम होते. 

- चीन व व्हिएतनाममधून माेठ्या प्रमाणात सुताची आयात केली जात आहे. कापसावरील आयात शुल्क सुरू करून त्यात वाढ करावी; तसेच कापसाच्या निर्यातीला साखरेप्रमाणे सबसिडी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

उत्पादन घटणार : या वर्षी देशात १२८ लाख हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी करण्यात आल्याने उत्पादन किमान नऊ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला होता. काॅटन बेल्टमध्ये सततचा अतिमुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण, झाडांची खुंटलेली वाढ, पातीगळ, बाेंडसड, गुलाबी बाेंडअळी व रस शाेषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यांमुळे उत्पादन मागील वर्षीएवढे किंवा त्यापेक्षा कमी हाेण्याचा अंदाज आहे.

सध्याचे सरासरी दर

महाराष्ट्र     ७,५०० ते ८,४०० रु.दक्षिण भारत    ७,६०० ते १०,२०० रु.उत्तर भारत    ७,८०० ते ८,४०० रु. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती