शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:35 IST

शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.

मुंबई : पावसाळ्यात शेवटच्या टप्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणे भरले गेली आहेत. मात्र पाणी वाटपाचे अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे असल्याने, रब्बीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणात मुबलक पाणी असताना सुद्धा शेतकऱ्यांना सरकारी धोरणाचा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात रब्बीचा हंगामा सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. मागील सरकारमध्ये पाणी वाटपाचे सर्व अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे होते. मात्र आता नवीन सरकार स्थापन होऊन ही जलसंपदामंत्री म्हणून अद्यापही कुणाचीचं निवड होऊ शकली नसल्याने, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन ठरत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

धरणातून पाणी न सोडल्यामुळे एक महिन्यापासून गहू, हरभऱ्याची पेरणी खोळंबली आहे. तर ऊस लागवडीचे नियोजन सुद्धा बिघडत चालले आहे. धरणे भरून सुद्धा शेतकऱ्यांना सरकारी धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे पाणी वाटपाचे अधिकार नव्या सरकारने पूर्वी प्रमाणे विभागीय पातळीवर देऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

तसेच राज्यात जलसंपदामंत्री नसल्याने कार्यकारी संचालक पाणी सोडण्याचे आदेश देऊ शकतात. त्यांना तसे अधिकार देण्यात आली असताना सुद्धा पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी पाणी सोडण्याचे निर्णय घेऊन पिके वाचवण्यासाठी एक पाण्याची पाळी घावी अशी सुद्धा मागणी शेतकरी करत आहे.