शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:35 IST

शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.

मुंबई : पावसाळ्यात शेवटच्या टप्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणे भरले गेली आहेत. मात्र पाणी वाटपाचे अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे असल्याने, रब्बीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणात मुबलक पाणी असताना सुद्धा शेतकऱ्यांना सरकारी धोरणाचा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात रब्बीचा हंगामा सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. मागील सरकारमध्ये पाणी वाटपाचे सर्व अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे होते. मात्र आता नवीन सरकार स्थापन होऊन ही जलसंपदामंत्री म्हणून अद्यापही कुणाचीचं निवड होऊ शकली नसल्याने, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन ठरत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

धरणातून पाणी न सोडल्यामुळे एक महिन्यापासून गहू, हरभऱ्याची पेरणी खोळंबली आहे. तर ऊस लागवडीचे नियोजन सुद्धा बिघडत चालले आहे. धरणे भरून सुद्धा शेतकऱ्यांना सरकारी धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे पाणी वाटपाचे अधिकार नव्या सरकारने पूर्वी प्रमाणे विभागीय पातळीवर देऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

तसेच राज्यात जलसंपदामंत्री नसल्याने कार्यकारी संचालक पाणी सोडण्याचे आदेश देऊ शकतात. त्यांना तसे अधिकार देण्यात आली असताना सुद्धा पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी पाणी सोडण्याचे निर्णय घेऊन पिके वाचवण्यासाठी एक पाण्याची पाळी घावी अशी सुद्धा मागणी शेतकरी करत आहे.