शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:35 IST

शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.

मुंबई : पावसाळ्यात शेवटच्या टप्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणे भरले गेली आहेत. मात्र पाणी वाटपाचे अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे असल्याने, रब्बीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणात मुबलक पाणी असताना सुद्धा शेतकऱ्यांना सरकारी धोरणाचा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात रब्बीचा हंगामा सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. मागील सरकारमध्ये पाणी वाटपाचे सर्व अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे होते. मात्र आता नवीन सरकार स्थापन होऊन ही जलसंपदामंत्री म्हणून अद्यापही कुणाचीचं निवड होऊ शकली नसल्याने, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन ठरत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

धरणातून पाणी न सोडल्यामुळे एक महिन्यापासून गहू, हरभऱ्याची पेरणी खोळंबली आहे. तर ऊस लागवडीचे नियोजन सुद्धा बिघडत चालले आहे. धरणे भरून सुद्धा शेतकऱ्यांना सरकारी धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे पाणी वाटपाचे अधिकार नव्या सरकारने पूर्वी प्रमाणे विभागीय पातळीवर देऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

तसेच राज्यात जलसंपदामंत्री नसल्याने कार्यकारी संचालक पाणी सोडण्याचे आदेश देऊ शकतात. त्यांना तसे अधिकार देण्यात आली असताना सुद्धा पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी पाणी सोडण्याचे निर्णय घेऊन पिके वाचवण्यासाठी एक पाण्याची पाळी घावी अशी सुद्धा मागणी शेतकरी करत आहे.