शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

साक्री तालुक्यात उपक्रमशील शेतकरी यांनी केला डॉ.नरेंद्र भदाणे गुलाब शेतीचा पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 08:24 IST

एकाच पिकावर अवलंबून न राहता व पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे.

ठळक मुद्देआधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे.डॉ.भदाणे यांनी एक एकर पालॉहाऊसमध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल गुलाबाची लागवड केली आहे.

- विशाल गांगुर्डेधुळे - एकाच पिकावर अवलंबून न राहता व पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे. डॉ.नरेंद्र रावसाहेब भदाणे हे एक तरुण शेतकरी आहेत. शेती करताना भविष्यातील गरज लक्षात घेता शेती उत्पन्न घेण्याची त्यांची पद्धत असल्याने शेतीत नवनव्या शेतीपुरक उत्पन्नांची निर्मिती करत असतात.डॉ.भदाणे यांनी एक एकर पालॉहाऊसमध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल गुलाबाची लागवड केली आहे. साधारण ३२ हजार रोपांची लागवड त्यांनी आॅगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात केली व ५० ते ५५ दिवसानंतर त्यांनी लाल गुलाब फुलाचे उत्पन्न घेणे सुरू केले आहेत. सध्या बांधावर हे फुल १० रुपये नगाने विक्री होत आहे. दररोज साडेतीन ते चार हजार फुल एका दिवसाला निघत असल्याने डॉ.भदाणे हि फुले सध्या दिल्ली, बडोदा, सुरत व नागपूर मार्केटमध्ये विक्रीसाठी जात आहे. शेताच्या बांधावरच व्यापारी येत असल्ळाने कुठल्याही प्रकारचा इतर खर्च शेतकऱ्यास नाही.डॉ.भदाणे यांनी व्हॅलेंटाईन-डे फेब्रुवारीत असल्याने लाल गुलाबाला मागणी देशभरात असल्याने त्या नियोजनाने ही शेती केली आहे. सदर गुलाब शेतीला दररोज १५ ते २० मिनीट पाणी द्यावे लागते. सदर गुलाब शेतीसाठी हलक्या मुरमाड जमिनीत फुल चांगले येते असे डॉ.भदाणे यांनी यावेळी सांगितले.डॉ.भदाणे हे प्रगतशील शेतकरी असल्याने ते आपल्या शेतात नवनवीन पद्धतीची शेती करतात त्यांची शेती सध्या शेतकºयांना रोलमॉडेल म्हणून ओळखली जाते. गुलाब शेतीची प्रेरणा त्यांना पुणे, तळेगाव, दाभाडी येथे ट्रेनिंगसाठी गेले असता मिळाली. डॉ.भदाणे यांनी सद्धा आपल्या शेतात २ एकरमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. तर १० एकरमध्ये डाळींबाची शेती ते करीत आहेत, शेततळे आहे.शेती क्षेत्रात बदल होणे गरजेचे आहे. आधुनिक पद्धतीने शेती करीत असताना भविष्याची गरज लक्षात घेता शेती उत्पादनाचे पिक घेतले पाहिजे. तरुण शेतक-यांनी नवनवीन उपक्रमाकडे वळावे. यामुळे शेतीत अधिक बदल होऊ शकतो व शेतकºयाचा विकास होईल..- डॉ.नरेंद्र रावसाहेब भदाणे,सामोडे, पिंपळनेर

टॅग्स :agricultureशेतीDhuleधुळेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी