शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका कसा? राजू शेट्टींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 09:04 IST

नेमके निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपणाला कंठ फुटलेला आहे. पाच वर्षात शेतकऱ्याचे किती प्रश्न सोडवलात,

मुंबई - गेली पाच वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकर्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.  

राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळालेला नाही. 17 जून 2017 रोजी राज्य शासनाने कर्जमाफी केली मात्र अद्यापही राज्यातील सुमारे तीस लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.  34 हजार कोटी माफी केली असताना केवळ 19 हजार कोटींची कर्जमाफी झालेले आहे असं असताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काय बोलू लागला आहात असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

तसेच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, मुंबईत कार्यालय असणाऱ्या कार्पोरेट कंपन्यानी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकविम्यात लूट केलेली आहे हे गेली तीन वर्ष चालू असताना अचानक आताच तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला. तिकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाने ग्रस्त आहे, त्याला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, टॅंकर माफीयाने उच्छाद मांडला आहे , चारा छावण्यात घोटाळे होत आहेत. या प्रश्नाकडे तुम्ही करड्या नजरेने कधीच बघितले नाही अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकविण्यासाठी जास्त जागांची गरज वाटू लागली तशी अचानक तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली ही तुमची सवय तशी जुनीच आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गर्जना केली “पहिले मंदिर फिर सरकार “ आणि जागावाटप पुर्ण होताच तुमची भूमिका बदलली “पहले सरकार फिर मंदिर” आता निवडणुका आल्या की पुन्हा तुम्ही एकमेकासोबत भांडत बसणार आहे असंही राजू शेट्टी यांनी सांगितले. 

दोघात भांडायचं व निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा सत्तेचे गाठोडे घेऊन पळून जायचं हा डाव आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही.  विजेचा प्रश्न आ वासून उभा आहे. दुष्काळाने  शेतकरी होरपळत चालला आहे.  सिंचन योजना जशाच्या तशा आहेत, राज्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे यावर आपण गप्प राहिलात. नेमके निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपणाला कंठ फुटलेला आहे. पाच वर्षात शेतकऱ्याचे किती प्रश्न सोडवलात, किती शेतकऱ्यांना न्याय दिलात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावच लागेल असा घणाघातही शेट्टींनी शिवसेनेला केला. 

दरम्यान कृषी क्षेत्राचा आर्थिक प्रगतीचा वेग वजा आठ टक्यापर्यंत खाली घसरला आहे. म्हणूनच शेती क्षेत्राची ही दुरावस्था झालेली आहे. अर्थात याला जबाबदार ना महाराष्ट्रातील जनता आहे ना महाराष्ट्रातील शेतकरी सरकारच फसलेलं धोरण हेच एकमेव कारण आहे. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. तुम्हीही या सरकारचे भागीदार आहात हे उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी जाणतो आहे असंही राजू शेट्टींनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी