शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

एसटीतील केवळ आठ कोरोनाबळींच्या कुटुंबीयांना मिळाली 50 लाखांची मदत, राज्यात १०७ कोरोनाबळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:16 IST

ST News : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

- दयानंद पाईकरावनागपूर : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु, १४ दिवस सलग ड्यूटी झालेली असावी, या क्लिष्ट नियमामुळे केवळ ८ कुटुंबांनाच ५० लाखाची मदत मिळाली असून, ९९ कुटुंबांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. (The families of only eight Coronabalis in ST received assistance of Rs 50 lakh, 107 Coronabalis in the state)लॉकडाऊनच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. अनलॉकनंतरही आता दुसऱ्या टप्प्यात कोरोना झपाट्याने पसरत चालला असतानाही ते प्रवाशांना सेवा देत आहेत. प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यात चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, सुरक्षा रक्षक अशा प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात एक लाख एसटी कर्मचारी आहेत. २३ मार्च २०२० ते २७ मार्च २०२१ दरम्यान महाराष्ट्रात ४,५०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर विमा कवचाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सलग १४ दिवस ड्युटी केलेली असावी, असा क्लिष्ट नियम एसटी महामंडळाने घातलेला आहे. त्यामुळे १०७ पैकी केवळ ८ कर्मचाऱ्यांच्याच कुटुंबीयांना ५० लाखाचे विमा कवच मिळू शकले. उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना विमा कवचाचा लाभ झाला नाही. त्यामुळे महामंडळाने हा नियम शिथिल करून उर्वरित कुटुंबांना ५० लाखाच्या विमा कवचाचा लाभ देण्याची मागणी होत आहे. 

एका दिवसातही होते कोरोनाची लागणकोरोनामुळे मृत्यू झाल्यास १४ दिवस सलग ड्युटी केलेली असावी, हा एसटी महामंडळाचा नियमच अन्यायकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक फेऱ्या रद्द असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना १४ दिवस सलग ड्युटी मिळू शकली नाही. एसटीचा एक कर्मचारी दिवसभरात ४०० ते ५०० प्रवाशांच्या संपर्कात येतो. कोरोना हा एका दिवसातही होऊ शकतो. त्यामुळे एसटी महामंडळाने हा नियम शिथिल करण्याची गरज आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून प्रवाशांना सेवा दिली. आजही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना ते प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने नियमात शिथिलता आणून उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाखाच्या विमा कवचाचा लाभ द्यावा.                 -अजय हट्टेवार,            प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार