शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

एसटीतील केवळ आठ कोरोनाबळींच्या कुटुंबीयांना मिळाली 50 लाखांची मदत, राज्यात १०७ कोरोनाबळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:16 IST

ST News : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

- दयानंद पाईकरावनागपूर : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु, १४ दिवस सलग ड्यूटी झालेली असावी, या क्लिष्ट नियमामुळे केवळ ८ कुटुंबांनाच ५० लाखाची मदत मिळाली असून, ९९ कुटुंबांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. (The families of only eight Coronabalis in ST received assistance of Rs 50 lakh, 107 Coronabalis in the state)लॉकडाऊनच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. अनलॉकनंतरही आता दुसऱ्या टप्प्यात कोरोना झपाट्याने पसरत चालला असतानाही ते प्रवाशांना सेवा देत आहेत. प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यात चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, सुरक्षा रक्षक अशा प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात एक लाख एसटी कर्मचारी आहेत. २३ मार्च २०२० ते २७ मार्च २०२१ दरम्यान महाराष्ट्रात ४,५०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर विमा कवचाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सलग १४ दिवस ड्युटी केलेली असावी, असा क्लिष्ट नियम एसटी महामंडळाने घातलेला आहे. त्यामुळे १०७ पैकी केवळ ८ कर्मचाऱ्यांच्याच कुटुंबीयांना ५० लाखाचे विमा कवच मिळू शकले. उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना विमा कवचाचा लाभ झाला नाही. त्यामुळे महामंडळाने हा नियम शिथिल करून उर्वरित कुटुंबांना ५० लाखाच्या विमा कवचाचा लाभ देण्याची मागणी होत आहे. 

एका दिवसातही होते कोरोनाची लागणकोरोनामुळे मृत्यू झाल्यास १४ दिवस सलग ड्युटी केलेली असावी, हा एसटी महामंडळाचा नियमच अन्यायकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक फेऱ्या रद्द असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना १४ दिवस सलग ड्युटी मिळू शकली नाही. एसटीचा एक कर्मचारी दिवसभरात ४०० ते ५०० प्रवाशांच्या संपर्कात येतो. कोरोना हा एका दिवसातही होऊ शकतो. त्यामुळे एसटी महामंडळाने हा नियम शिथिल करण्याची गरज आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून प्रवाशांना सेवा दिली. आजही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना ते प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने नियमात शिथिलता आणून उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाखाच्या विमा कवचाचा लाभ द्यावा.                 -अजय हट्टेवार,            प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार